Jio-Airtel यूजर्सना लागणार झटका, तुम्ही वापरता का?

मुंबई: जिओ आणि एअरटेलमध्ये अनेकदा टक्कर पाहायला मिळते. मग ते प्लान्स असो वा नेटवर्क. प्रत्येक गोष्टीत दोन्ही कंपन्यांमध्ये टक्कर सुरू असते. त्यातच आता या दोनही कंपनींच्या ५जी यूजर्सना झटका लागू शकतो.


२०२४मध्ये काही महिन्यांनी जिओ आणि एअरटेलचा अनलिमिटेड ५जी डेटा प्लान संपवणार आहे. यासोबतच या प्लान्सची किंमत ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते.


नव्या रिपोर्टनुसार ४जी टॅरिफच्या मदतीने कंपन्या रेव्हेन्यू ग्रोथ वाढवण्यावर जोर देत आहेत. ऑक्टोबर २०२२मध्ये जिओ आणि एअरटेलने ५जी सर्व्हिस लाँच केली होती. यानंतर ४जी इंटरनेटच्या किंमतीत युजर्सना ५ जी इंटरनेट दिले जात आहे. मात्र आता अनलिमिटेड ५जी ऑफर लवकरच संपणार आहे. कारण दोनही कंपन्या ५जी सर्व्हिस प्लान्समध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत.


दोन्ही कंपन्या भारतात ५जी बाबत सातत्याने काम करत आहे. जिओ आणि एअरटेलचे १२५ मिलियनहून अधिक युजर्स आहेत. २०२४मध्ये ५जी युजर्सची संख्या २०० मिलियन पार करू शकते. दरम्यान, मिळालेल्या रिपोर्टनुसार एअरटेल आणि जिओ आपल्या ५जी डेटा प्लान्समध्ये ५ ते १० टक्के वाढ करू शकते.

Comments
Add Comment

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबई : दहिसर पूर्व येथील जनकल्याण एस.आर.ए. इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, विजेचा धक्का लागून ५ जण गंभीररित्या भाजले; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.