Jio-Airtel यूजर्सना लागणार झटका, तुम्ही वापरता का?

  225

मुंबई: जिओ आणि एअरटेलमध्ये अनेकदा टक्कर पाहायला मिळते. मग ते प्लान्स असो वा नेटवर्क. प्रत्येक गोष्टीत दोन्ही कंपन्यांमध्ये टक्कर सुरू असते. त्यातच आता या दोनही कंपनींच्या ५जी यूजर्सना झटका लागू शकतो.


२०२४मध्ये काही महिन्यांनी जिओ आणि एअरटेलचा अनलिमिटेड ५जी डेटा प्लान संपवणार आहे. यासोबतच या प्लान्सची किंमत ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते.


नव्या रिपोर्टनुसार ४जी टॅरिफच्या मदतीने कंपन्या रेव्हेन्यू ग्रोथ वाढवण्यावर जोर देत आहेत. ऑक्टोबर २०२२मध्ये जिओ आणि एअरटेलने ५जी सर्व्हिस लाँच केली होती. यानंतर ४जी इंटरनेटच्या किंमतीत युजर्सना ५ जी इंटरनेट दिले जात आहे. मात्र आता अनलिमिटेड ५जी ऑफर लवकरच संपणार आहे. कारण दोनही कंपन्या ५जी सर्व्हिस प्लान्समध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत.


दोन्ही कंपन्या भारतात ५जी बाबत सातत्याने काम करत आहे. जिओ आणि एअरटेलचे १२५ मिलियनहून अधिक युजर्स आहेत. २०२४मध्ये ५जी युजर्सची संख्या २०० मिलियन पार करू शकते. दरम्यान, मिळालेल्या रिपोर्टनुसार एअरटेल आणि जिओ आपल्या ५जी डेटा प्लान्समध्ये ५ ते १० टक्के वाढ करू शकते.

Comments
Add Comment

गणपतीत तुमची कारही जाणार रेल्वे मार्गावरून

कोकण रेल्वे देणार 'रो-रो' सेवा मुंबई (प्रतिनिधी) :कोकण रेल्वे महामंडळ येत्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास

पंचशीलनगरला दरडीच्या तोंडी नोटीस देऊन अधिकारी निर्धास्त

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात अनेक झोपडपट्ट्या अशा आहेत, ज्या डोंगरावर किंवा डोंगर उतारावर वसल्या आहेत. त्यापैकीच

पहिल्या यादीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा अकरावीत प्रवेश

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही राज्यातील विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नव्हता.

'समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला इशारा मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा संदर्भातील दोन जीआर रद्द केले आहेत.

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास, विद्यार्थी हितासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती - मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर मुंबई : राज्यात सर्व

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिकांचा रंग हवा पांढरा

अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी