राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आयुष्मान खुराना सहभागी होणार

मुंबई : बॉलिवूड स्टार आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याला अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.


या शुभ समारंभात आयुष्मान (Ayushman Khurana) हा सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी, टीएस कल्याण रामन, विराट कोहली, रजनीकांत, मनमोहन सिंग, धनुष, मोहनलाल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, प्रभास, यश या भारतीय चित्रपट उद्योगातील आणि उद्योगपतींसह भारतातील सर्वात मोठ्या दिग्गजांसोबत सामील होणार आहे.


मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संपर्क प्रमुख अजित पेंडसे यांनी ‘राम लल्ला’च्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी आयुष्मानला वैयक्तिकरित्या निमंत्रण दिले.


मिळालेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी ‘प्राण प्रतिष्ठे’च्या निमित्ताने एक लाखाहून अधिक भाविक मंदिरात दर्शनासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला केवळ भाविकच नाही तर अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योगपती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच