Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात! बापलेकासह पाच जणांचा जागीच मृत्यू

  112

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांत राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) अशीच एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली असून या भीषण अपघातात (Terrible Accident) बापलेकासह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


बीड-नगर मार्गावरील लिंबागणेश गावापासून काही अंतरावरील ससेवाडी शिवारात काल शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. ट्रक व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या जोरदार धडकीमुळे वडील-मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात प्रल्हाद सिताराम घरत (वय ६३), नितिन प्रल्हाद घरत (४१, दोघेही रा. महाजनवाडी ता. जि. बीड) या पिता-पुत्रासह विनोद लक्ष्मण सानप (४० रा. वाघिरा ता. पाटोदा) अशा तिघांसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत अन्य दोघांची रात्री ११ पर्यंत ओळख पटली नव्हती. शवविच्छेदनासाठी मृतदेह बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.


ओळख न पटलेले ट्रकमधील असल्याचे समजते. अपघात एवढा भीषण होता की सर्व मृतांना बाहेर काढण्यासाठी एकमेकांमध्ये अडकलेल्या वाहनांचा पत्रा कापण्यासाठी यंत्र मागवावे लागले होते. घटनास्थळावर एक क्रेनही आणण्यात आला होता. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून नेकनूर पोलीस व स्थानिक नागरिकांचे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतकार्य सुरू होते.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा