Unseasonal rain : अवकाळी पावसाने आणली शेतक-यांवर संक्रांत

कांदा, हरभरा पीकावर परिणाम तर गव्हाचे पीक झाले आडवे


संतोष टेमक


शनिशिंगणापुर : ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) कांदा, हरभरा व गहु पिकांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरापासुन ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.


अतिवृष्टी, गारपीट व अवेळी आलेल्या पावसामुळे शेतीचे तंत्र बिघडत असल्यामुळे एकप्रकारे शेतक-यांवर संक्रांत आल्याने शेतक-यांमध्ये नैराश्य दिसून येत आहे. एकीकडे खते, बियाणे, औषधे, मशागतीचे वाढलेले दर आणि दुसरीकडे शेतमालांचे पडलेले दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.


नेवासा तालुक्यातील नेवासा, करजगाव, पानेगाव, सोनई, खरवंडी, हिंगोणी, भेंडा, कुकाणा, चांदा, वडाळा आदी परिसरात वा-यासह अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


"मोठ्या जिकरीने व पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेला गहु अवकाळीने पुर्णपणे झोपला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमाही काढलेला असुन पंचनामा करून पुर्ण भरपाई द्यावी." - शरद सोनवणे, शेतकरी, हिंगोणी

Comments
Add Comment

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा