Indian Passport: भारतीय पासपोर्टची ताकद वाढली, पाहा कितव्या स्थानावर पोहोचला

नवी दिल्ली: भारतीय पासपोर्टची(passport) ताकद पुन्हा एकदा वाढली आहे. आता भारतीय पासपोर्टने ३ स्थानांनी उडी घेत ८०व्या स्थानावर पोहोचला आहे. असेही म्हणता येऊ शकता की भारत आता पासपोर्टच्या जगातील ८०वा सर्वात ताकदवान पासपोर्ट बनला आहे.



६२देशाना मिळाला व्हिसा फ्री अॅक्सेस


हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या ताज्या माहितीनुसार भारतीय पासपोर्टला उझबेकिस्तानसोबत ८०व्या स्थानावर ठेवण्यात आला आहे. आता भारताचे लोक ६२ देशांमध्ये व्हिसा फ्री अॅक्सेस मिळवू शकतात. त्या देशांमध्ये भूतान, ब्रिटीश व्हर्जिन आयलड, बार्बाडोस, थायलंड, जॉर्डन, मलेशिया, मालदीव, श्रीलंका, मॉरिशस आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.



या देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल


काही आणखीही असे देश आहेत जिथे भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळत आहे. या देशांमद्ये कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मान्यमार, तिमुर-लेस्टे, बोलिव्हिया, बुरूंडी, केप वेर्डे आयलँड्स, कोमोरो आयलँड, जिबुती, गाबोन, मेडागास्कर, सेशेल्स, मॉरिटेनिया, मोझाम्बिक, सिएरा लिओन, सोमालिया, समोआ, तंजानिया आणि झिम्बाब्वेचा समावेश आहे.



भारतानतर या देशांचा नंबर


याआधी २०२३मध्ये भारतीय पासपोर्टची रँकिग ८३ इतकी होती. आता २०२४मध्ये भारतानंतर हेनली इंडेक्सवर भूतान, चाड, इजिप्त, जॉर्डन, म्यानमार, अंगोला, मंगोलिया, मोझाम्बिक, ताजिकिस्तान, मेडागास्कर, बुर्किना फासो, कोटे डी आयवर, इक्विटोरियल गिनी, सेनेगल, अल्जीरिया, कंबोडिया आणि माली या देशांचे स्थान आहे.



सगळ्यात ताकदवान पासपोर्ट


सगळ्यात ताकदवान पासपोर्टबाबत बोलायचे झाल्यास फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन अव्वल स्थानावर आहेत. या देशातील लोक व्हिसाशिवा १९४ देशांत जाऊ शकतात.

Comments
Add Comment

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने