Indian Passport: भारतीय पासपोर्टची ताकद वाढली, पाहा कितव्या स्थानावर पोहोचला

नवी दिल्ली: भारतीय पासपोर्टची(passport) ताकद पुन्हा एकदा वाढली आहे. आता भारतीय पासपोर्टने ३ स्थानांनी उडी घेत ८०व्या स्थानावर पोहोचला आहे. असेही म्हणता येऊ शकता की भारत आता पासपोर्टच्या जगातील ८०वा सर्वात ताकदवान पासपोर्ट बनला आहे.



६२देशाना मिळाला व्हिसा फ्री अॅक्सेस


हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या ताज्या माहितीनुसार भारतीय पासपोर्टला उझबेकिस्तानसोबत ८०व्या स्थानावर ठेवण्यात आला आहे. आता भारताचे लोक ६२ देशांमध्ये व्हिसा फ्री अॅक्सेस मिळवू शकतात. त्या देशांमध्ये भूतान, ब्रिटीश व्हर्जिन आयलड, बार्बाडोस, थायलंड, जॉर्डन, मलेशिया, मालदीव, श्रीलंका, मॉरिशस आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.



या देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल


काही आणखीही असे देश आहेत जिथे भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळत आहे. या देशांमद्ये कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मान्यमार, तिमुर-लेस्टे, बोलिव्हिया, बुरूंडी, केप वेर्डे आयलँड्स, कोमोरो आयलँड, जिबुती, गाबोन, मेडागास्कर, सेशेल्स, मॉरिटेनिया, मोझाम्बिक, सिएरा लिओन, सोमालिया, समोआ, तंजानिया आणि झिम्बाब्वेचा समावेश आहे.



भारतानतर या देशांचा नंबर


याआधी २०२३मध्ये भारतीय पासपोर्टची रँकिग ८३ इतकी होती. आता २०२४मध्ये भारतानंतर हेनली इंडेक्सवर भूतान, चाड, इजिप्त, जॉर्डन, म्यानमार, अंगोला, मंगोलिया, मोझाम्बिक, ताजिकिस्तान, मेडागास्कर, बुर्किना फासो, कोटे डी आयवर, इक्विटोरियल गिनी, सेनेगल, अल्जीरिया, कंबोडिया आणि माली या देशांचे स्थान आहे.



सगळ्यात ताकदवान पासपोर्ट


सगळ्यात ताकदवान पासपोर्टबाबत बोलायचे झाल्यास फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन अव्वल स्थानावर आहेत. या देशातील लोक व्हिसाशिवा १९४ देशांत जाऊ शकतात.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही