INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० जिंकण्याचे स्वप्न भंगले, तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

मुंबई: टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी-२० ामन्यात भारतीय संघाला ७ विकेटनी हरवले. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १४८ धावांचे आव्हान होते. एलिसी हीलीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने १८.४ षटकांत ३ विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले. या पद्धतीने कांगारूंनी ही मालिका २-१ अशी जिंकली. भारतीय संघाने पहिल्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते. मात्र शेवटच्या दोन टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.



एलिसा हीली आणि बेथ मूनीने सामना एकतर्फी बनवला


भारताच्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरूवात शानदार झाली. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हीली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. एलिसा हीलीने ३८ बॉलमध्ये ५५ धावा केल्या. तर बेथ मूनीने ४५ बॉलमध्ये ५२ धावा करत नाबाद राहिल्या. ताहिला मॅकग्राथने १५ बॉलमध्ये २० धावा केल्या. तर एलिस पॅरी शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र फोएबो लिचफील्ड १३ बॉलमध्ये १७ धावांवर नाबाद राहिली.



भारतीय फलंदाजांची निराशा


याआधी ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीलीने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांचा फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरूवात चांगली झाली. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी ४.४ षटकांत ३९ धावा केल्या. यानंतर नियमित अंतराने भारताचे विकेट पडत गेले. भारतासाठी ऋचा घोष हिने सर्वाधिक २८ बॉलमध्ये ३४ धावांची खेळी केली. शेफाली वर्माने १७ बॉलमध्ये २६ धावा केल्या.

Comments
Add Comment

Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर

Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स

IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त