Maldives controversy : भारताने शिकवला धडा तर चीनसमोर मदत मागतोय मालदीव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लक्षद्वीप यात्रेवर मालदीवच्या काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याची किंमत या देशाला भोगावी लागत आहे. त्यांना त्यांच्या पर्यटनामध्ये नुकसान भोगावे लागत आहे. आता मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांना चीनमधून त्यांच्या देशात पर्यटक पाठवले जावेत यासाठी विनवणी करावी लागत आहे.


मोहम्मद मुईज्जू सोमवारपासून चीनच्या पाच दिवसीय राजकीय यात्रेवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदीविरुद्ध मालदीवचे मंत्र्यांनी अपमानजनक विधान केल्यानंतर बॉयकॉट मालदीव अशी भूमिका भारतातील अनेकजण घेत आहेत. भारतीय पर्यटकांकडून रिझर्व्हेशन कॅन्सल केल्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मुईज्जू यांनी मंगळवारी चीनला अपील केले की ते आपल्या देशातून सर्वाधिक पर्यटक पाठवावेत.



चीनच्या कौतुकादरम्यान काय म्हणाले मोहम्मद मुईज्जू?


आपल्या दौऱ्यादरम्यान, दुसऱ्या दिवशी मुईज्जूने फुजियान प्रांतात मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना म्हटले की चीन सगळ्यात जवळचा सहकारी आणि विकासातील भागीदारीपैकी एक आहे. मुईज्जूने २०१४मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगकडून सुरू केलेल्या बेल्ट अँड रोन इनिशिएटिव्ह योजनेचे कौतुक केले.


चीनने मालदीवच्या इतिहासात पाहिलेली सर्वात महत्त्वाची योजना प्रदान केली आहे. यासोबतच त्यांनी चीनमधून मालदीवमध्ये आपल्या पर्यटकांचा प्रवाह वाढवण्याचा आग्रह केला आहे. त्यांनी अधिकृत वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेल्या एका रीडआऊटमध्ये म्हटले की, कोरोनाआधी चीन आमचा(मालदीवचा) नंबर एक बाजार होता आणि आमची मागणी आहे की चीनला हे स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवावे लागतील.



या मंत्र्यांनी केले होते मोदींबाबत आक्षेपार्ह विधान


मुइज्जू सरकारने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींबाबत अपमानजनक विधआन केले होते. त्यानंतर मालदीव सरकारने तीन उप मंत्र्यांना निलंबित केले होते. सोबतच मालदीव असोसिएशन ऑफ टूरिझ्म इंडस्ट्रीनेही या आक्षेपार्ह विधानावर टीका केली होती.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही