Maldives controversy : भारताने शिकवला धडा तर चीनसमोर मदत मागतोय मालदीव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लक्षद्वीप यात्रेवर मालदीवच्या काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याची किंमत या देशाला भोगावी लागत आहे. त्यांना त्यांच्या पर्यटनामध्ये नुकसान भोगावे लागत आहे. आता मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांना चीनमधून त्यांच्या देशात पर्यटक पाठवले जावेत यासाठी विनवणी करावी लागत आहे.


मोहम्मद मुईज्जू सोमवारपासून चीनच्या पाच दिवसीय राजकीय यात्रेवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदीविरुद्ध मालदीवचे मंत्र्यांनी अपमानजनक विधान केल्यानंतर बॉयकॉट मालदीव अशी भूमिका भारतातील अनेकजण घेत आहेत. भारतीय पर्यटकांकडून रिझर्व्हेशन कॅन्सल केल्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मुईज्जू यांनी मंगळवारी चीनला अपील केले की ते आपल्या देशातून सर्वाधिक पर्यटक पाठवावेत.



चीनच्या कौतुकादरम्यान काय म्हणाले मोहम्मद मुईज्जू?


आपल्या दौऱ्यादरम्यान, दुसऱ्या दिवशी मुईज्जूने फुजियान प्रांतात मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना म्हटले की चीन सगळ्यात जवळचा सहकारी आणि विकासातील भागीदारीपैकी एक आहे. मुईज्जूने २०१४मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगकडून सुरू केलेल्या बेल्ट अँड रोन इनिशिएटिव्ह योजनेचे कौतुक केले.


चीनने मालदीवच्या इतिहासात पाहिलेली सर्वात महत्त्वाची योजना प्रदान केली आहे. यासोबतच त्यांनी चीनमधून मालदीवमध्ये आपल्या पर्यटकांचा प्रवाह वाढवण्याचा आग्रह केला आहे. त्यांनी अधिकृत वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेल्या एका रीडआऊटमध्ये म्हटले की, कोरोनाआधी चीन आमचा(मालदीवचा) नंबर एक बाजार होता आणि आमची मागणी आहे की चीनला हे स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवावे लागतील.



या मंत्र्यांनी केले होते मोदींबाबत आक्षेपार्ह विधान


मुइज्जू सरकारने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींबाबत अपमानजनक विधआन केले होते. त्यानंतर मालदीव सरकारने तीन उप मंत्र्यांना निलंबित केले होते. सोबतच मालदीव असोसिएशन ऑफ टूरिझ्म इंडस्ट्रीनेही या आक्षेपार्ह विधानावर टीका केली होती.

Comments
Add Comment

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना