Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका मार्चआधीच जाहीर होणार!

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) कधी जाहीर होणार याबाबत कोणीही निश्चित सांगत नसून अनेकजण वेगवेगळ्या तारखा सांगत आहेत. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ नये यासाठी ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक संदर्भातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्व बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने यासंदर्भात तसे पत्रच राज्य सरकारला पाठवले आहे. यामुळे देशात मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम लागू केला जाण्याची शक्यता आहे.


अनेक पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजप महायुती आणि इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे देशभरात लोकसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आलेला पाहायला मिळत आहे.


देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये आले आहे. निवडणुकांच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोग राज्यांच्या दौऱ्याना प्रारंभ केला आहे. आयोग सर्व प्रथम आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Supreme Court On SIR : SIR नंतर मतदार यादीतून नाव हटलं तरी नागरिकत्व रद्द होत नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेनंतर एखाद्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले गेले, तरी त्यामुळे

Google Doodle for FIFA Final 2026 : Google Doodle वर FIFA फायनलचा जल्लोष! अर्जेंटिना विरुद्ध स्पेन अंतिम सामन्यासाठी गुगलकडून खास डुडलची रचना

नवी दिल्ली : फुटबॉल विश्वाचे लक्ष लागलेल्या FIFA World Cup 2026 च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर Google ने आपल्या होमपेजवर

#FacebookDown : जगभरात मेटासह फेसबुकची सेवा ठप्प! लॉगिन, न्यूज फीड, वेबसाइट बंद; लाखो वापरकर्ते त्रस्त

मुंबई : जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकची ( #FacebookDown ) सेवा आज

US Visa : एफ-१ आणि जे-१ व्हिसाधारकांसाठी अमेरिकेचे नवे नियम; भारतीय विद्यार्थ्यांची वाढली चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) स्थलांतराशी संबंधित एक नवा आणि कठोर नियम लागू

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून