Ekanath Shinde : ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? कर नाही त्याला डर कशाला?

विरोधकांनी विरोध केलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना दिल्याने त्यांना पोटशूळ उठला आहे


विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल


मुंबई : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांच्या घरी धाड टाकली. आज सकाळी सात वाजल्यापासून ही छापेमारी (ED raid) सुरू होती. यावर विरोधकांनी आकसापोटी ही कारवाई केली असल्याची टीका केली. त्यांच्या या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘कर नाही त्याला डर कशाला? जे काय असेल ते दूध का दूध, पानी का पानी होईल’ असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.


मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “रवींद्र वायकरांवर ईडीने टाकलेल्या धाडीची मला माहिती नाही. मी माहिती घेतो. पण ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? ज्यांची काही चूक नसेल, ज्यांना कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे? कोणत्याही प्रकारच्या सूड भावनेने राजकीय आकस ठेवून आमचं सरकार कोणतंही काम करणार नाही”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.



विरोधकांना पोटशूळ उठला आहे


पुढे मुख्यमंत्री म्हणाले, “कोविडमध्ये त्यांनी किती पैसे खाल्ले हे सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं रेकॉर्डवर आहे. मग आम्ही त्यांना काय म्हणायचं? कफन चोर म्हणायचं की खिचडी चोर म्हणायचं? पुराव्याशिवाय आरोप करू नये. कुणालाही घाबरण्याची काय गरज आहे? जे काय असेल ते दूध का दूध, पानी का पानी होईल. आम्ही आकसापोटी कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्याला पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत. विरोधकांनी विरोध केलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देतोय. त्यामुळेच त्यांना पोटशूळ उठला आहे”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.



वायकर यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापेमारी


जोगेश्वरी भागात मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलं व त्याची परवानगी त्यांनी पालिकेकडून घेतली नव्हती, असा आरोप त्यांच्यावर आहे. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला होता. या प्रकरणी रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात