Disputes between MVA : जागावाटपाआधीच मविआत धुसफूस; वाद आले चव्हाट्यावर!

दक्षिण मुंबईसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकमेकांना भरला दम


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Losabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. एकीकडे महायुती (Mahayuti) राज्यव्यापी दौरे करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील (MVA) वाद दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहेत. जागावाटपाआधीच त्यांच्यात मतभेद होत असल्याचं वारंवार समोर येत आहे. काही वेळेस तर आघाडीत काय निर्णय झाला आहे, हे त्यांच्यापैकी काही प्रमुख नेत्यांना माहितच नसते. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या वेळी मविआमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चिन्हे आहेत. त्यातच आज दक्षिण मुंबईवरुन (South Mumbai) ठाकरे गट (Thackeray group) व काँग्रेसमधील (Congress) वाद चव्हाट्यावर आला आहे, ज्याचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे.


खासदार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शनिवारी गिरगावात सभा घेतली. ठाकरे गटाने दक्षिण मुंबईत आपला प्रबळ दावा केला असतानाच 'ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी ठरणार नाही. तेव्हा कुणीही सार्वजनिक वक्तव्ये किंवा दावे करू नयेत', असा इशारा काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी दिला.


लोकसभा जागा वाटपासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसताना ठाकरे गटाकडून जागांवर केल्या जाणाऱ्या दाव्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा जागेनंतर दक्षिण मुंबईसाठीही काँग्रेस आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुनच महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटात पेच निर्माण होणार आहे, हे स्पष्ट आहे.



काय म्हणाले मिलिंद देवरा?


काँग्रेस नेते मिलिंद देवरा म्हणाले की, "माझे मतदार कार्यकर्ते समर्थक मला फोन करत आहेत. महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष दक्षिण मुंबईच्या जागेसाठी एकतर्फी दावा करत आहे. त्यामुळे तुमची चिंता वाढणे साहजिक आहे. मला कुठल्याही प्रकारे वाद वाढवायचा नाही किंवा करायचा नाही. त्यांच्या एका प्रवक्त्यानं मागील आठवड्यात काँग्रेस पक्षाला शून्यापासून सुरुवात करायला सांगितली. गिरगावच्या सभेत पुन्हा एकदा दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी त्या घटक पक्षाकडून दावा करण्यात आला आहे."


पुढे ते म्हणाले, "मागील ५० वर्षापासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. देवरा परिवार हा मतदारसंघ लढवत आला आहे. खासदार असो वा नसो लोकांची कामं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात केली आहेत. कुठल्याही लाटेत आम्ही निवडून आलेलो नाही, काम आणि नात्यांनी आम्ही हा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत जिंकला आहे. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही, कोणीही सार्वजनिक वक्तव्य किंवा दावे करू नयेत, जर एखादा पक्ष औपचारिक चर्चेआधी जर अशा प्रकारे दावे करत असेल, तर काँग्रेससुद्धा जागांवर दावा करू शकते आणि उमेदवार देऊ शकते, मला वाटतं हा संदेश दिल्ली आणि मुंबईतील काही महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल.", असं मिलिंद देवरा म्हणाले. यामुळे मविआत यापुढे जागावाटपावरुन आणखी काय वाद रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Heat Wave in Maharashtra : उष्णतेचा वाढता कहर! राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; आरोग्य विभाग सतर्क

राज्यभरात उन्हाचा तडाखा (Heat Wave in Maharashtra) दिवसेंदिवस तीव्र होत असून, त्याचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर

Pratap Sarnaik : “व्यवसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

मुंबई : “महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे.

Nida Khan case Matin Patel : निदा खान प्रकरणात MIM नगरसेवक अडचणीत! मतीन पटेलांच्या घर-कार्यालयावर महापालिकेचा बुलडोझरचा इशारा

नाशिकमधील चर्चित टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान (Nida Khan) हिला आश्रय दिल्याच्या आरोपामुळे एमआयएमचे नगरसेवक मतीन

Food Adulteration : फळे आणि भाज्यांमध्ये घातक रसायनांचा वापर करणारे रडारवर

- दोषींचे परवाने रद्द होणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचा इशारा मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या

Maharashtra FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता

'Corporate Jihad' : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी ५० पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर, २५ हून अधिक शिफारसी

मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’' (Corporate Jihad') प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला