बॅकफूटवर मालदीव! पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांविरुद्ध होणार कारवाई, सरकारचे विधान

नवी दिल्ली: मालदीव्सच्या नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत अपमानजक विधान केले होते. आता मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नसीद यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. नसीद म्हणाले की भारत मालदीव्सच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी प्रमुख सहयोगी आहे आणि अशा विधानाने द्विपक्षीय संबंधांना नुकसान होऊ शकते.



काय आहे वाद


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो पोस्ट केले होते. तसेच भारतीयांना या आयलँडवर फिरण्याचे आवाहनही केले होते. मालदीवच्या युवा सशक्तीकरण उपमंत्री मरियन शिऊनाने पंतप्रधान मोदींबाबत अपमाजनक विधान केले होते. भारताच्या इंटरनेट युजर्सकडून विरोध झाल्यानंतर शिऊनाने ती पोस्ट डिलीट केली होती. मात्र सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.


भारतात मालदीवच्या मंत्र्यांकडून झालेल्या या विधानावर जोरदार टीका झाली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मरियम शिऊनाच्या वादग्रस्त विधानावरही रोष व्यक्त केला आहे यानंतर मालदीव आता बॅकफूटवर आला आहे.


याबाबतीत मालदीव सरकारने एक विधान जारी केले आहे, मालदीव सरकार परदेशी नेते आणि उच्च पदस्थ व्यक्तींविरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या अपमानजनक विधानाबाबत ज्ञात आहे. हे मत वैयक्तिक आहे आणि मालदीव सरकारच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाही. याशिवाय सरकारशी संबंधिक अधिकारी असे विधान करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात कोणताही संकोच बाळगणार नाही.

Comments
Add Comment

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार

सर्वोच्च न्यायालयात घडली धक्कादायक घटना, वकिलाने केला सरन्यायाधीशांवर हल्ला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीशांवर वस्तू फेकून हल्ला केला. या

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ