बॅकफूटवर मालदीव! पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांविरुद्ध होणार कारवाई, सरकारचे विधान

नवी दिल्ली: मालदीव्सच्या नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत अपमानजक विधान केले होते. आता मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नसीद यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. नसीद म्हणाले की भारत मालदीव्सच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी प्रमुख सहयोगी आहे आणि अशा विधानाने द्विपक्षीय संबंधांना नुकसान होऊ शकते.



काय आहे वाद


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो पोस्ट केले होते. तसेच भारतीयांना या आयलँडवर फिरण्याचे आवाहनही केले होते. मालदीवच्या युवा सशक्तीकरण उपमंत्री मरियन शिऊनाने पंतप्रधान मोदींबाबत अपमाजनक विधान केले होते. भारताच्या इंटरनेट युजर्सकडून विरोध झाल्यानंतर शिऊनाने ती पोस्ट डिलीट केली होती. मात्र सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.


भारतात मालदीवच्या मंत्र्यांकडून झालेल्या या विधानावर जोरदार टीका झाली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मरियम शिऊनाच्या वादग्रस्त विधानावरही रोष व्यक्त केला आहे यानंतर मालदीव आता बॅकफूटवर आला आहे.


याबाबतीत मालदीव सरकारने एक विधान जारी केले आहे, मालदीव सरकार परदेशी नेते आणि उच्च पदस्थ व्यक्तींविरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या अपमानजनक विधानाबाबत ज्ञात आहे. हे मत वैयक्तिक आहे आणि मालदीव सरकारच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाही. याशिवाय सरकारशी संबंधिक अधिकारी असे विधान करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात कोणताही संकोच बाळगणार नाही.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या