बॅकफूटवर मालदीव! पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांविरुद्ध होणार कारवाई, सरकारचे विधान

नवी दिल्ली: मालदीव्सच्या नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत अपमानजक विधान केले होते. आता मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नसीद यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. नसीद म्हणाले की भारत मालदीव्सच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी प्रमुख सहयोगी आहे आणि अशा विधानाने द्विपक्षीय संबंधांना नुकसान होऊ शकते.



काय आहे वाद


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो पोस्ट केले होते. तसेच भारतीयांना या आयलँडवर फिरण्याचे आवाहनही केले होते. मालदीवच्या युवा सशक्तीकरण उपमंत्री मरियन शिऊनाने पंतप्रधान मोदींबाबत अपमाजनक विधान केले होते. भारताच्या इंटरनेट युजर्सकडून विरोध झाल्यानंतर शिऊनाने ती पोस्ट डिलीट केली होती. मात्र सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.


भारतात मालदीवच्या मंत्र्यांकडून झालेल्या या विधानावर जोरदार टीका झाली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मरियम शिऊनाच्या वादग्रस्त विधानावरही रोष व्यक्त केला आहे यानंतर मालदीव आता बॅकफूटवर आला आहे.


याबाबतीत मालदीव सरकारने एक विधान जारी केले आहे, मालदीव सरकार परदेशी नेते आणि उच्च पदस्थ व्यक्तींविरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या अपमानजनक विधानाबाबत ज्ञात आहे. हे मत वैयक्तिक आहे आणि मालदीव सरकारच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाही. याशिवाय सरकारशी संबंधिक अधिकारी असे विधान करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात कोणताही संकोच बाळगणार नाही.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही