Ram Mandir : अयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना '२२ जानेवारी'लाच का?

नवी दिल्ली : अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची (Ramlalla) प्राणप्रतिष्ठापना (Pran Pratishtha) सोमवार, २२ जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे अयोध्येत रामाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. परंतु, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारी या दिवसाचीच का निवड करण्यात आली? हा दिवस प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यामागे काय कारण आहे?


ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात अभिजीत मुहूर्तावर झाला होता. सोमवार, २२ जानेवारी रोजी मृगशीर्ष नक्षत्रात अभिजीत मुहूर्ताचा योगायोग आहे. अशा स्थितीत, या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी १२.११ पासून सुरू होईल आणि १२.५४ पर्यंत चालेल. तसेच या विशेष तिथीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. या वेळी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त १२.१९ ते १२.३० पर्यंत असेल. या काळात मृगाशिरा नक्षत्र असेल. त्यामुळेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी ही तारीख निवडण्यात आली आहे.


याशिवाय या शुभ मुहूर्तावर रामलल्लाचा अभिषेक केल्याने प्रभू श्रीराम सदैव मूर्तीमध्ये वास करतील, अशीही श्रद्धा आहे. सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहूनच केले जाते. त्यामुळे रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकासाठी पौष महिन्यातील द्वादशी निवडण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७