Ram Mandir : अयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना '२२ जानेवारी'लाच का?

नवी दिल्ली : अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची (Ramlalla) प्राणप्रतिष्ठापना (Pran Pratishtha) सोमवार, २२ जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे अयोध्येत रामाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. परंतु, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारी या दिवसाचीच का निवड करण्यात आली? हा दिवस प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यामागे काय कारण आहे?


ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात अभिजीत मुहूर्तावर झाला होता. सोमवार, २२ जानेवारी रोजी मृगशीर्ष नक्षत्रात अभिजीत मुहूर्ताचा योगायोग आहे. अशा स्थितीत, या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी १२.११ पासून सुरू होईल आणि १२.५४ पर्यंत चालेल. तसेच या विशेष तिथीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. या वेळी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त १२.१९ ते १२.३० पर्यंत असेल. या काळात मृगाशिरा नक्षत्र असेल. त्यामुळेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी ही तारीख निवडण्यात आली आहे.


याशिवाय या शुभ मुहूर्तावर रामलल्लाचा अभिषेक केल्याने प्रभू श्रीराम सदैव मूर्तीमध्ये वास करतील, अशीही श्रद्धा आहे. सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहूनच केले जाते. त्यामुळे रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकासाठी पौष महिन्यातील द्वादशी निवडण्यात आली आहे.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी