Eknath Shinde : आणि स्वतःच टुणकन उडी मारुन मुख्यमंत्री बनले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप


पुणे : आपल्याला पदाचा मुख्यमंत्रिपदाचा मोह कधीच नव्हता आणि नाही. आपण जी भूमिका घेतली ती शिवसेना वाचवण्यासाठी आणि शिवसेनेचे (Shivsena) खच्चीकरण थांबवण्यासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते पुण्यातील खेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शिवसंकल्प अभियानामध्ये बोलत होते.


यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना १९८५ साली मुख्यमंत्री होता आले असते. पण त्यांनी आपल्या सहकाऱ्याला मुख्यमंत्री बनवले. पण २०१९ मध्ये संधी आल्यावर स्वतःच टुणकन उडी मारुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी स्वतःच पदावर जाऊन बसले, अशी टीका करत मुख्यमंत्रिपद घेऊन काय मिळवलं? काय गमावलं याचा विचार त्यांनी करावा, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास खात्याचा मंत्री होतो. माझ्यासोबत शिवसेनेचे सात-आठ मंत्री बाहेर पडले. सत्तेवर लाथ मारुन कुणी जात नाही, सत्तेच्या दिशेने जात असतात. पण सत्ता सोडण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना टिकवण्यासाठी आम्ही केले, असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


जर बंड करायचे असते तर २०१९ ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर जे काही घडू लागले त्याचवेळी केले असते. पण त्यावेळेस माझ्या मनात तेव्हाही नव्हतं आणि आत्ताही नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे.


राज्यातील अंगणवाडीसेविकांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. एक बैठक त्यावर झाली आहे. एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर