Corona : महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे नवे आदेश, कोरोनाबाधित झाल्यास ५ दिवस होम आयसोलेशन

मुंबई: कोरोनाचा(corona) वाढता प्रकोप पाहता महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने(maharashtra covid task force) महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यात म्हटले आहे की पुढील १५ दिवसांपर्यंत लोकांना अधिक लक्ष द्यावे लागेल. टास्क फोर्सने सल्ला दिला आहे की जे रुग्ण ताप, सर्दी आणि खोकल्याने पिडीत आहेत त्यांची कोरोना चाचणी गरजेची आहे. कोविड टास्क फोर्सची बैठक २ जानेवारीला झाली होती. बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कोरोना झाल्यास पाच दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल.



जास्त जोखीम असलेल्या रुग्णांना रुग्णालयात भर्ती करण्याचे आदेश


आदेशात म्हटले आहे की होम आयसोलेशनदरम्यान अशा रूममध्ये राहावे लागेल जिथे ताजी हवा येत असेल. दुसऱ्यांदा कोरोना होऊ नये यासाठी मास्क गरजेचा आहे. वरिष्ठ नागरिक तसेच घरात ज्यांना आरोग्याची जास्त जोखीम आहे अशा लोकांनी मास्क जरूर वापरावा असे आदेश देण्यात आले आहेत.


ज्यांना जास्त जोखीम आहे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. टास्क फोर्स लवकरच नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटच्या पृष्ठभूमीमध्ये औषधासंबंधी क्लिनिकल प्रोटोकॉलची घोषणा करणार आहे. सोबतच लोकांना अपील करण्यात आले आहे की ते सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.



महाराष्ट्रात कोरोनाचे १४६ नवे रुग्ण


महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे नवे १४६ रुग्ण आढळले. तर उपचारानंतर एका दिवसांत १२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोना व्हेरिएंट जेएन१ची एकही केस दाखल झालेली नाही. आतापर्यंत ११० जेएन१ व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळले आहेत. अॅक्टिव्ह केसची संख्या राज्यात ९१४ इतकी आहे. राजधानी मुंबईत कोरोना बाधिक ३१ नवे रुग्ण आढळले. १५ रुग्णांना शहरात उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या