Corona : महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे नवे आदेश, कोरोनाबाधित झाल्यास ५ दिवस होम आयसोलेशन

मुंबई: कोरोनाचा(corona) वाढता प्रकोप पाहता महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने(maharashtra covid task force) महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यात म्हटले आहे की पुढील १५ दिवसांपर्यंत लोकांना अधिक लक्ष द्यावे लागेल. टास्क फोर्सने सल्ला दिला आहे की जे रुग्ण ताप, सर्दी आणि खोकल्याने पिडीत आहेत त्यांची कोरोना चाचणी गरजेची आहे. कोविड टास्क फोर्सची बैठक २ जानेवारीला झाली होती. बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कोरोना झाल्यास पाच दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल.



जास्त जोखीम असलेल्या रुग्णांना रुग्णालयात भर्ती करण्याचे आदेश


आदेशात म्हटले आहे की होम आयसोलेशनदरम्यान अशा रूममध्ये राहावे लागेल जिथे ताजी हवा येत असेल. दुसऱ्यांदा कोरोना होऊ नये यासाठी मास्क गरजेचा आहे. वरिष्ठ नागरिक तसेच घरात ज्यांना आरोग्याची जास्त जोखीम आहे अशा लोकांनी मास्क जरूर वापरावा असे आदेश देण्यात आले आहेत.


ज्यांना जास्त जोखीम आहे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. टास्क फोर्स लवकरच नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटच्या पृष्ठभूमीमध्ये औषधासंबंधी क्लिनिकल प्रोटोकॉलची घोषणा करणार आहे. सोबतच लोकांना अपील करण्यात आले आहे की ते सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.



महाराष्ट्रात कोरोनाचे १४६ नवे रुग्ण


महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे नवे १४६ रुग्ण आढळले. तर उपचारानंतर एका दिवसांत १२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोना व्हेरिएंट जेएन१ची एकही केस दाखल झालेली नाही. आतापर्यंत ११० जेएन१ व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळले आहेत. अॅक्टिव्ह केसची संख्या राज्यात ९१४ इतकी आहे. राजधानी मुंबईत कोरोना बाधिक ३१ नवे रुग्ण आढळले. १५ रुग्णांना शहरात उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०