Jitendra Awhad : रामाला मांसाहारी म्हणणं जितेंद्र आव्हाडांना चांगलंच भोवणार!

आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक


ठाणे : देशभरात सध्या सर्व हिंदूंना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे (Ram mandir inauguration) वेध लागले आहेत. रामाचा वनवास संपावा यासाठी हिंदूंची असलेली प्रतिक्षा आता संपणार आहे. मात्र, या उत्साही वातावरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. प्रभू श्रीराम मांसाहारी आहे, असं वक्तव्य करत त्यांनी रामाचा अपमान केला आहे. या प्रकरणी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला असून हे वक्तव्य आव्हाडांना चांगलंच भोवणार आहे.


जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. घाटकोपरचे आमदार राम कदम आव्हाडांविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवणार आहेत. आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.



भाजप आमदार तुषार भोसले आणि नाशिकचे पुजारीही आक्रमक


भाजपच्या अध्यात्म आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनीदेखील आव्हाडांवर टीका केली आहे. रामायणात शूपर्णखादेखील रावणाला सांगते की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही कंदमुळे आणि फळे खातात. मात्र, आव्हाड प्रभू श्रीराम मांसाहार करत असल्याचे वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली. तर, नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी हे देखील आज नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत.



अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी महाआरती करत नोंदवला निषेध


ठाण्यातील आव्हाडांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी महाआरती करत निषेध केला. कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीराम यांचा हातात फोटो घेऊन आंदोलन केले. तर, आव्हाड यांच्या विरोधात येत्या २४ तासात गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास वर्तक नगर पोलीस ठाण्यात महाआरती करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.


Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद