Eknath Khadse : राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच खडसेंचा आव्हाडांना घरचा आहेर

  202

शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिर्डी येथील शिबीराचा आज समारोप होत आहे. काल आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी श्री राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कालचा दिवस चांगलाच गाजला. जितेंद्र आव्हाड यांनी राम आमचा आणि तो बहुजन असल्याचे वादग्रस्त विधान केले. राम शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. ते शिकार करून खायचे. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वक्तव्याबाबत राज्यात सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आव्हाडांना घरचा आहेर दिला.


स्वपक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी देखिल आव्हाडांना सल्ला दिला आहे. खडसे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांना वडीलकीच्या नात्याने सांगतो. त्यांनी अशी वक्तव्य करु नये. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अशी वक्तव्य टाळावी. जितेंद्रने काल विषय सांगितला की श्रीराम मांसाहारी होते. त्यांचे ते व्यक्तिगत मत असू शकते. ते पक्षाचे मत असेल असे मला वाटत नाही. ज्या ठिकाणी श्रद्धेचा, भावनेचा विषय असतो, यापेक्षा महत्वाचे म्हणजे समोर निवडणुका असताना असे वादग्रस्त वक्तव्य टाळावे, असे मी त्यांना वडीलकीच्या नात्याने सल्ला देतो. तो माझा अधिकार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक