Eknath Khadse : राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच खडसेंचा आव्हाडांना घरचा आहेर

शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिर्डी येथील शिबीराचा आज समारोप होत आहे. काल आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी श्री राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कालचा दिवस चांगलाच गाजला. जितेंद्र आव्हाड यांनी राम आमचा आणि तो बहुजन असल्याचे वादग्रस्त विधान केले. राम शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. ते शिकार करून खायचे. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वक्तव्याबाबत राज्यात सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आव्हाडांना घरचा आहेर दिला.


स्वपक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी देखिल आव्हाडांना सल्ला दिला आहे. खडसे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांना वडीलकीच्या नात्याने सांगतो. त्यांनी अशी वक्तव्य करु नये. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अशी वक्तव्य टाळावी. जितेंद्रने काल विषय सांगितला की श्रीराम मांसाहारी होते. त्यांचे ते व्यक्तिगत मत असू शकते. ते पक्षाचे मत असेल असे मला वाटत नाही. ज्या ठिकाणी श्रद्धेचा, भावनेचा विषय असतो, यापेक्षा महत्वाचे म्हणजे समोर निवडणुका असताना असे वादग्रस्त वक्तव्य टाळावे, असे मी त्यांना वडीलकीच्या नात्याने सल्ला देतो. तो माझा अधिकार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये