Ramdas Athawale : वंचित आणि ठाकरे गटाच्या १२-१२ फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू

रामदास आठवले यांची सणसणीत टीका


नाशिक : सध्या राज्यभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीकडून वाद नसल्याचे दाखवण्यात येत असले तरी त्यांच्यात जागावाटपावरुन मतभेद होत आहेत, हे स्पष्ट आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) युती केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वंचित बहुजन आघाडीवर सणसणीत टीका केली. शिवाय महायुतीचाच (Mahayuti) विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.


केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे आज धुळे शहरात आले असता शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वंचित आणि ठाकरे गटाच्या १२-१२ फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.


रामदास आठवले म्हणाले, वंचित आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे की नाही आपल्याला माहित नाही, मात्र प्रकाश आंबेडकरांना युती करायची असेल तर ती महाविकास आघाडी सोबत करावी लागेल ठाकरेंसोबत नाही. त्यांचा जो १२- १२ चा फॉर्म्युला ठरला आहे तो अतिशय योग्य असून आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, असं आठवले म्हणाले.


पुढे आठवले म्हणाले, इंडिया आघाडीने आम्हाला कितीही हरवण्याचे प्रयत्न केले तरी २०२४च्या निवडणुकीत आम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. इंडिया आघाडीला आम्हाला हरवण्याचा अधिकार असला तरी सुद्धा आमचाच विजय होईल. मतदार जनता त्यांच्या बाजूने गेली तरच आम्ही हरु शकतो. मात्र मतदार जनता आमच्या सोबत असल्यामुळे आमच्या हरण्याचा प्रश्नच येत नाही, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.


Comments
Add Comment

Minor Girl Abuse Case : धक्कादायक! कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; पित्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होताना दिसून येत आहे.

NEET Paper Leak : मॉडर्न कॉलेजकडून मोठी कारवाई! प्राध्यापिका मनीषा मांढरे अखेर निलंबित

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला