Ramdas Athawale : वंचित आणि ठाकरे गटाच्या १२-१२ फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू

रामदास आठवले यांची सणसणीत टीका


नाशिक : सध्या राज्यभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीकडून वाद नसल्याचे दाखवण्यात येत असले तरी त्यांच्यात जागावाटपावरुन मतभेद होत आहेत, हे स्पष्ट आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) युती केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वंचित बहुजन आघाडीवर सणसणीत टीका केली. शिवाय महायुतीचाच (Mahayuti) विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.


केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे आज धुळे शहरात आले असता शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वंचित आणि ठाकरे गटाच्या १२-१२ फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.


रामदास आठवले म्हणाले, वंचित आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे की नाही आपल्याला माहित नाही, मात्र प्रकाश आंबेडकरांना युती करायची असेल तर ती महाविकास आघाडी सोबत करावी लागेल ठाकरेंसोबत नाही. त्यांचा जो १२- १२ चा फॉर्म्युला ठरला आहे तो अतिशय योग्य असून आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, असं आठवले म्हणाले.


पुढे आठवले म्हणाले, इंडिया आघाडीने आम्हाला कितीही हरवण्याचे प्रयत्न केले तरी २०२४च्या निवडणुकीत आम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. इंडिया आघाडीला आम्हाला हरवण्याचा अधिकार असला तरी सुद्धा आमचाच विजय होईल. मतदार जनता त्यांच्या बाजूने गेली तरच आम्ही हरु शकतो. मात्र मतदार जनता आमच्या सोबत असल्यामुळे आमच्या हरण्याचा प्रश्नच येत नाही, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.


Comments
Add Comment

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे