सरकारी धोरणाच्या निषेधार्ह बागलाणच्या शेतकऱ्यांचा गांजा लागवडीचा प्रयत्न

जायखेडा पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई


वटार : काल शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून गांजा लागवड करण्याचा निर्णय घेणारे आंदोलन छेडले.

जिल्हाउपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडनीस यांनी या संदर्भात शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट करतांना म्हटले आहे की, कुठल्याच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्यात केंद्र व राज्य सरकार अयशस्वी ठरत आहे. शेतकरी अन्यायाविरुद्ध लोकप्रतिनिधी देखील लक्ष केंद्रित करत नसल्याने नाईलाज म्हणून शेतकऱ्यांना हे पाऊल उचलणे भाग पडत आहे.

शेतकरी गांजा लागवडीचा आंदोलनात्मक प्रयत्न करीत असतांना जायखेडा पोलिसांनी अशा पद्धतीने लागवड करता येत नाही, हा कायद्याने गुन्हा असून सदर लागवड थांबवावी अशी सूचना केली. त्यावर सरकार अचानक निर्यात बंदी सारखे निर्णय घेऊन दर पाडते. त्यावेळी कुठल्याही शेतकऱ्यांची परवानगी घेत नाही. विचारपुस करत नाही. शेतकऱ्यांनी वाढते खताचे,कीटनाशक,बुरशी नाशक, तसेच शेती उपयोगी वस्तुंचे दर या अशा महागाईच्या खाईत कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकरी वर्गाने उपस्थित केला.

या प्रसंगी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. पुरुषोत्तम शिरसाठ यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यात शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडणीस, बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, बाळासाहेब शेवाळे, माणिक निकम, भिका सुर्यवंशी, भास्कर बागुल, महेंद्र जाधव, ज्ञानेशवर जाधव, यशवंत गुंजाळ ज्ञाने आणि परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य