सरकारी धोरणाच्या निषेधार्ह बागलाणच्या शेतकऱ्यांचा गांजा लागवडीचा प्रयत्न

  60

जायखेडा पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई


वटार : काल शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून गांजा लागवड करण्याचा निर्णय घेणारे आंदोलन छेडले.

जिल्हाउपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडनीस यांनी या संदर्भात शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट करतांना म्हटले आहे की, कुठल्याच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्यात केंद्र व राज्य सरकार अयशस्वी ठरत आहे. शेतकरी अन्यायाविरुद्ध लोकप्रतिनिधी देखील लक्ष केंद्रित करत नसल्याने नाईलाज म्हणून शेतकऱ्यांना हे पाऊल उचलणे भाग पडत आहे.

शेतकरी गांजा लागवडीचा आंदोलनात्मक प्रयत्न करीत असतांना जायखेडा पोलिसांनी अशा पद्धतीने लागवड करता येत नाही, हा कायद्याने गुन्हा असून सदर लागवड थांबवावी अशी सूचना केली. त्यावर सरकार अचानक निर्यात बंदी सारखे निर्णय घेऊन दर पाडते. त्यावेळी कुठल्याही शेतकऱ्यांची परवानगी घेत नाही. विचारपुस करत नाही. शेतकऱ्यांनी वाढते खताचे,कीटनाशक,बुरशी नाशक, तसेच शेती उपयोगी वस्तुंचे दर या अशा महागाईच्या खाईत कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकरी वर्गाने उपस्थित केला.

या प्रसंगी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. पुरुषोत्तम शिरसाठ यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यात शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडणीस, बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, बाळासाहेब शेवाळे, माणिक निकम, भिका सुर्यवंशी, भास्कर बागुल, महेंद्र जाधव, ज्ञानेशवर जाधव, यशवंत गुंजाळ ज्ञाने आणि परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या