सरकारी धोरणाच्या निषेधार्ह बागलाणच्या शेतकऱ्यांचा गांजा लागवडीचा प्रयत्न

  62

जायखेडा पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई


वटार : काल शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून गांजा लागवड करण्याचा निर्णय घेणारे आंदोलन छेडले.

जिल्हाउपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडनीस यांनी या संदर्भात शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट करतांना म्हटले आहे की, कुठल्याच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्यात केंद्र व राज्य सरकार अयशस्वी ठरत आहे. शेतकरी अन्यायाविरुद्ध लोकप्रतिनिधी देखील लक्ष केंद्रित करत नसल्याने नाईलाज म्हणून शेतकऱ्यांना हे पाऊल उचलणे भाग पडत आहे.

शेतकरी गांजा लागवडीचा आंदोलनात्मक प्रयत्न करीत असतांना जायखेडा पोलिसांनी अशा पद्धतीने लागवड करता येत नाही, हा कायद्याने गुन्हा असून सदर लागवड थांबवावी अशी सूचना केली. त्यावर सरकार अचानक निर्यात बंदी सारखे निर्णय घेऊन दर पाडते. त्यावेळी कुठल्याही शेतकऱ्यांची परवानगी घेत नाही. विचारपुस करत नाही. शेतकऱ्यांनी वाढते खताचे,कीटनाशक,बुरशी नाशक, तसेच शेती उपयोगी वस्तुंचे दर या अशा महागाईच्या खाईत कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकरी वर्गाने उपस्थित केला.

या प्रसंगी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. पुरुषोत्तम शिरसाठ यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यात शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडणीस, बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, बाळासाहेब शेवाळे, माणिक निकम, भिका सुर्यवंशी, भास्कर बागुल, महेंद्र जाधव, ज्ञानेशवर जाधव, यशवंत गुंजाळ ज्ञाने आणि परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार

'ब्राह्मण पाताळयंत्री', जाधव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटणार?

भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर

रक्षाबंधनच्या लॉन्ग विकेंडने एसटीला कमावून दिले १३७ कोटींचे विक्रमी उत्पन्न

मुंबई: यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये एसटी महामंडळाने

Police Bharti Maharashtra 2025 : ठरलं तर मग, महाराष्ट्रात जम्बो पोलिस भरतीचं बिगुल! १५ हजार पदांसाठी आजच हिरवा कंदील

मुंबई : महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपण्याच्या

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर ही आहे तुमच्यासाठी गुडन्यूज

ठाणे महापालिकेत मेगाभरती, 'गट-क व गट-ड' पदांसाठी १ हजार ७७३ रिक्तपदे जाहीर