रायगड जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी

पेणमधील अनेक पेट्रोल पंपात पुरेसे इंधन


पेण : केंद्र शासनाच्या वतीने वाहन चालकांच्या संदर्भात हिट अँड रनच्या नवीन धोरणाच्या निषेधार्थ देशभरासह महाराष्ट्रातील अनेक वाहन चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलेला होता. या संपामध्ये पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे चालक देखील सहभागी झाल्याने पुढील काही दिवस पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवेल या भीतीनं पेणसह रायगड जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर अचानक वाहनधारकांनी गर्दी केली. वाहतूक बंद असल्याने अनेक पेट्रोल पंपावरचा डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा संपत आला आहे. तर, काही ठिकाणी शिल्लक असलेल्या पेट्रोल डिझेल मिळावा यासाठी वाहनधारकांनी एकच गर्दी केलेली आहे.



ट्रक आणि टँकरच्या संपामुळे राज्यातील अनेक पेट्रोल आणि डिझेलचे टँकर कंपनी व पेट्रोल पंपावर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर इंधन पोहोचू शकले नसल्याने यापुढे देखील संप सुरूच राहिला तर पेट्रोल डिझेल इंधन मिळणार नाही या भीतीने अनेकांनी आपल्या गाड्यांमध्ये जादाचा पेट्रोल टाकण्यासाठी पेणसह अलिबाग, नागोठणे, रोहा, महाड, पोयनाड, पाली, खोपोलीसह रायगड जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर गर्दी केली होती.


पेण शहरातील पेट्रोल पंपामध्ये सध्याच्या स्थितीला पुरेसे इंधन असल्याने या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी लाईन लागली असली तरी जोपर्यंत पंपामध्ये पेट्रोल आहे, तोपर्यंत आम्ही जनतेला सेवा देत राहणार असल्याचे पेण मधील सर्वच पेट्रोल पंपाचे मालक सांगत आहेत. पंप मालकांच्या या लोकहितवादी निर्णयाचे पेणकरांनी स्वागत केले आहे.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे