मणिपूरमध्ये ४ जणांची गोळी घालून हत्या, अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू

  80

इंफाळ: मणिपूरमध्ये(manipur) नव्या वर्षाच्या संध्याकाळी हिंसाचाराची घटना घडली. सोमवारी थौबल जिल्ह्यात ४ जणांची गोळी घालून हत्या करण्यात आली आणि इतर जखमी झाले. यानंतर राज्यातील पाच घाटी जिल्ह्यांमध्ये पुन्हा कर्फ्यू लावण्यात आला.


मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्लेखोर बंदूकधाऱ्यांची ओळख पटलेली नाही. हे हल्लेखोर लिलोंग चिंगजाओ क्षेत्रात पोहोचले आणि तेथील स्थानिक लोकांना त्यांनी आपले निशाण बनवले. यात त्यांनी केलेल्या गोळीबारात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.



मणिपूरमधील या ५ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू


हल्ल्यानंतर चिडलेल्या जमावाने तीन चारचाकी गाड्यांना आग लावली नाही. मात्र या कार कोणाच्या होत्या हे स्पष्ट झालेले नाही. या हिंसाचारानंतर थौबल, इन्फाळ पूर्व, इन्फाळ पश्चिम, काकचिंग आणि विष्णूपूर जिल्ह्यात पुन्हा कर्फ्यू लावण्यात आला.



३ मेपासून आतापर्यंत १८०हून अधिक जणांचा मृत्यू


३ मे २०२३ला मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार भडकल्यानंतर आतापर्यंत १८०हून अधिक लोक मारले गेले. यात १००हून अधिक जखमी झालेत. ३ मेला जेव्हा डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकजुटता मोर्चा आयोजित करण्यात आला होता तेव्हा हिंसाचार उसळला होता.

Comments
Add Comment

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा