मणिपूरमध्ये ४ जणांची गोळी घालून हत्या, अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू

इंफाळ: मणिपूरमध्ये(manipur) नव्या वर्षाच्या संध्याकाळी हिंसाचाराची घटना घडली. सोमवारी थौबल जिल्ह्यात ४ जणांची गोळी घालून हत्या करण्यात आली आणि इतर जखमी झाले. यानंतर राज्यातील पाच घाटी जिल्ह्यांमध्ये पुन्हा कर्फ्यू लावण्यात आला.


मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्लेखोर बंदूकधाऱ्यांची ओळख पटलेली नाही. हे हल्लेखोर लिलोंग चिंगजाओ क्षेत्रात पोहोचले आणि तेथील स्थानिक लोकांना त्यांनी आपले निशाण बनवले. यात त्यांनी केलेल्या गोळीबारात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.



मणिपूरमधील या ५ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू


हल्ल्यानंतर चिडलेल्या जमावाने तीन चारचाकी गाड्यांना आग लावली नाही. मात्र या कार कोणाच्या होत्या हे स्पष्ट झालेले नाही. या हिंसाचारानंतर थौबल, इन्फाळ पूर्व, इन्फाळ पश्चिम, काकचिंग आणि विष्णूपूर जिल्ह्यात पुन्हा कर्फ्यू लावण्यात आला.



३ मेपासून आतापर्यंत १८०हून अधिक जणांचा मृत्यू


३ मे २०२३ला मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार भडकल्यानंतर आतापर्यंत १८०हून अधिक लोक मारले गेले. यात १००हून अधिक जखमी झालेत. ३ मेला जेव्हा डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकजुटता मोर्चा आयोजित करण्यात आला होता तेव्हा हिंसाचार उसळला होता.

Comments
Add Comment

Bihar elections: पंतप्रधान घेणार १० जाहीर सभा तर अमित शहा २५ सभा घेणार

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या १० जाहीर सभा प्रस्तावित आहेत.

'या' महिलांना पोटगी मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : घटस्फोट प्रकरणात पोटगी हा महत्वाचा मुद्दा असतो. वैवाहिक भांडणे न्यायालयात सादर झाल्यावर पोटगी वरून

आगळीक कराल तर याद राखा; पाकिस्तानची इंच न् इंच जमीन 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा लखनऊमध्ये 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी तयार;

सणासुदीच्या बाजारात ७ लाख कोटींची ऐतिहासिक खरेदी; मोदींच्या जीएसटी कपातीचा 'जादुई' प्रभाव!

महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जीएसटी दर कपातीच्या

मालगाडीतून तब्बल २ कोटींचे प्रतिबंधित कफ सिरप जप्त! सरकारी रेल्वे पोलिस दल आणि सीमाशुल्क विभाग यांची संयुक्त कारवाई

त्रिपुरा : देशभरात सध्या हानीकारक खोकल्याच्या औषधांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विषारी खोकल्याच्या औषधाच्या

'या' ८ राज्यांमध्ये मतदानाच्या दिवशी 'सवेतन' सुट्टी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

बिहार विधानसभा आणि पोटनिवडणुकांसाठी घोषणा; पगार कपात करणाऱ्या मालकांवर कारवाई होणार नवी दिल्ली: भारतीय निवडणूक