New year celebration : नवीन वर्षाचे स्वागत नियमात राहून करा अन्यथा...

  257

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांचा इशारा


नाशिक : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने नियमात राहून करा, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेत आनंद उत्सव साजरा करा, मात्र जल्लोष करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार असाल तर यासाठी नाशिक पोलीस देखील सज्ज झालेले आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी.


परिमंडळ दोनच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून यामध्ये फिक्स पॉईंट, गुन्हे शोध पथकांची हद्दीत गस्त असणार आहे. वरिष्ठ अधिकारी सर्वच ब्लॅक स्पोट व रस्त्यांवर आनंद उत्सव साजरा करण्याच्या जोशात चूक करणार नाही याची विशेष काळजी घेण्यासाठी स्वतः हजर राहणार असून टवाळखोरांवर, मद्यपींवर, कर्नकर्कश हॉर्न वाजवणाऱ्यांवर दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.


या काळात अनेक अपघात होत असतात यासाठी देखील खबरदारीच्या उपायोजना म्हणून जागोजागी पोलीस अधिकारी व अंमलदार ड्रिंक अँड ड्राईव्ह केसेस करणार असून यापुढे देखील अशा प्रकारच्या कारवाया पोलिसांमार्फत निरंतर चालू राहतील, याची विशेष काळजी घेऊन कुठलीही चूक न करता आनंदात नवीन वर्षाचे स्वागत करावं.


त्याचबरोबर उपायुक्त मोनिका राऊत यांनी शहरवासीयांना एक संदेश दिला आहे तुम्ही आनंदी राहावं आम्हालाही यात विशेष आनंद आहे परंतु इतरांना त्रास देऊन कायदा हातात घ्याल तर मात्र कुणाचीही गय केली जाणार नाही. यावेळी परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांसह विभाग चार चे सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब डुकळे, पोलीस नाईक कुराडे, महिला पोलीस आंमलदर संध्या कांबळे, पोलीस शिपाई झाडे, पोलीस शिपाई ढाकणे, पोलीस हवालदार शेख, ए.एस.आय स्वामी, सागर जाधव आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती