Sambhaji Nagar: संभाजी नगरमधील एका कंपनीला भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू

संभाजी नगर: महाराष्ट्रच्या संभाजीनगर(sambhajinagar) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हातातील मोजे बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये अचानक आग(fire) लागली. या आगीत होरपळून ६ मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातात ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. ही घटना औद्योगिक क्षेत्रात हाताचे मोजे बनवणारी कंपनी सनशाईन एंटरप्रायजेसमध्ये झाली आहे.


ही दुर्घटना ३० डिसेंबरच्या रात्री घडली होती. या कंपनीत १० कामगार झोपले होते. मोजे बनवणारी कंपनी सनशाईन एंटरप्रायजेस सी २१६, वालाज औद्योगिक क्षेत्रात २० ते २५ कामगारांना रोजगार दिला जातो. १० कामगार कंपनीतच राहत होते. गेल्या रात्री जेव्हा सर्व लोक बाहेर झोपत होते तेव्हा अचानक उष्णता वाढल्याने झोपलेले कर्मचारी जागी झाले. दारावरच आग लागल्याने त्यांना बाहेर पडताच आले नाही. मात्र काही कागारांना पत्रा उचलून झाडाच्या मदतीने बाहेर आले.


 


मृत कामगारांमध्ये मिर्झापूरचे भल्ला शेख, कौसर शेख, इकबाल शेख मगरूफ शेख आणि इतर दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा २.१५ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी जेव्हा टीम पोहोचली तेव्हा फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या दरम्यान, स्थानिक लोकांनी सांगितले की फॅक्टरीच्या आत ६ जण अडकले होते.


यानंतर फायर ब्रिगेडचे कर्मचारी आत आले आणि त्यांनी ६ मृतदेह हाती घेतले. कंपनीमध्ये ज्या वेळेस आग लागली त्यावेळेस १०-१५ कर्मचारी आत झोपले होते. यातील चार जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. मात्र ६ जण आपला जीव वाचवू शकले नाहीत.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "