KL Rahul: सोशल मीडियावरील ट्रोल्समुळे त्रस्त होता टीम इंडियाचा संकटमोचक

मुंबई: दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियनमध्ये सलग दुसरी सेंच्युरी ठोकणारा टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने(KL Rahul) सोशल मीडियावरील ट्रोलपासून बचावाच्या आपल्या पद्धतीबाबत खुलेपणाने सांगितले. त्याने यावर जोर दिला की कोणत्याही इतर खेळाडूंप्रमाणेच त्याच्यावरही निगेटिव्ह कमेंट्सचा परिणाम होतो.


राहुलने सांगितले की या वर्षाच्या सुरूवातीला दुखापतीमुळे त्याला त्याच्या बुद्धीवर काम करण्यास वेळ मिळाला आणि त्याला हे समजले की आपल्या बॅटला बोलू देणे हेच सोशल मीडियावरील नकारात्मकता दूर करण्याची पद्धत आहे.



वर्षाच्या सुरूवातीला झाला होता बाहेर


सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शानदार शतक ठोकल्यानंतर केएल राहुलने याचा खुलासा केला. केएल राहुल या वर्षाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान बाहेर झाला होता. त्यानंतर केएल राहुलने आता कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे आणि येताच शानदार शतकही झळकावले.


केएल राहुल आयपीएलदरम्यानही दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो अनेक महिने क्रिकेट खेळू शकला नव्हता. याच कारणामुळए तो विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा भागही नव्हता. दरम्यान त्याने आशिया कपद्वारे पुनरागमन केले आणि कमालीची फलंदाजी केली.



आशिया चषकातून शानदार पुनरागमन


केएल राहुलने आशिया चषकात अनेक शानदार खेळी केल्या. त्यानंतर त्याने विश्वचषकात केवळ पाचव्या स्थानावरील भूमिकाच चोख निभावली नाही तर विकेटकीपिंगनेही कमाल केली. केएल राहुल डीआरएस घेण्याबाबत कर्णधाराला अतिशय योग्य सल्ला देत होता.


सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याबाबत बोलायचे झाल्यास भारताने पहिल्या डावात केएल राहुलच्या शानदार शतकाच्या जोरावर एकूण २४५ धावा केल्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ बाद २५६ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गर नेहमीप्रमाणे क्रीझवर टिकून आहे आणि १४० धावांवर नाबाद आहे.

Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील