Ranbir Kapoor : धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली रणबीर कपूरविरोधात तक्रार दाखल

रणबीरने 'जय माता दी' म्हणत केलं असं काही, की नेटकरी संतापले...


मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Bollywood Actor Ranbir Kapoor) सध्या 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा ५०० कोटींहून अधिक कमाई करत प्रचंड यशस्वी झाला आहे. त्यातच त्याने ख्रिसमसच्या (Christmas) दिवशी त्याची मुलगी राहाला (Raha Kapoor) पहिल्यांदा पॅपराझींसमोर आणलं. राहाचा गोंडस अंदाज सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळेही रणबीर चर्चेत आला आहे. पण याचसोबत आता रणबीर अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


अभिनेता रणबीर कपूरने आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कपूर कुटुंबच जास्त दिसत आहे. यातील ख्रिसमस साजरा करतानाची रणबीरची एक कृती चाहत्यांच्या आवडली नसून त्याविषयी त्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या या कृतीविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.





रणबीर कपूर ख्रिसमस सेलिब्रेशनच्या या व्हिडिओमध्ये जय माता दी असं म्हणतो. या यानंतर तो केकवर दारू ओततो आणि त्याला आग लावतो. नेटिझन्सना त्याची ही कृती अजिबात आवडली नाही. रणबीरवर धार्मिक भावना (Religious sentiments) दुखावल्याचा आरोप होत आहे. याशिवाय सोशल मीडियावरही त्याला खूप ट्रोल केले जात आहे.


रणबीरविरोधात काल मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तथापि, या प्रकरणात अद्याप कोणताही प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आलेला नाही. वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत संजय तिवारी यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.




 


काय आहे तक्रार?


पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हिंदू धर्मात इतर देवतांचे आर्जव करण्यापूर्वी अग्निदेवतेचे आवाहन केले जाते, परंतु कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जाणूनबुजून अमली पदार्थाचा वापर केला आणि दुसर्‍या धर्माचा सण साजरा करताना जय माता दीचा नारा दिला. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Accident : मुंबईत वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांनी गमावला जीव, पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई : चेंबूर आणि माटुंगा परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत मोटरसायकलवर मागे बसून प्रवास

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, बहिणीच्या घरी रक्षाबंधनानिमित्त आगमन; विमानतळावर एकनाथ शिंदेंसोबत १० मिनिटे चर्चा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी

BMC : मुंबईतील १९७ किलोमीटर अंतराचे पदपथ झाले अतिक्रमणमुक्त; महापलिका प्रशासनाचा दावा

तब्बल २०० पैकी १३४ रस्त्यांच्या पदपथावरील अतिक्रमण हटवले https://prahaar.in/2026/08/29/bjp-minister-jaykumar-gores-brother-joins-shiv-sena/ मुंबई (विशेष

Agniveer : अग्निवीरांसाठी खूशखबर! सेवेतून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्रात मिळणार पुनर्नियुक्ती

राज्य सरकारकडून १ हजार अधिसंख्य पदे मंजूर; गृह, वन, राज्य उत्पादन शुल्क आणि नगर विकास विभागांचा

Mumbai Higjh Court : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या ‘मराठी सक्ती’विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

राज्य सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार मुंबई : राज्यातील रिक्षा आणि

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालय FDA वर नाराज, MCA च्या बंद आस्थापना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपली ताठर भूमिका सोडावी, अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी लागेल,