राजकारणाच्या पिचवर उतरला अंबाती रायडू, जगन मोहन रेड्डींचा पक्ष YSR काँग्रेसमध्ये झाला सामील

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर अंबाती रायडूने(ambati raydu) आंध्र प्रदेशच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. ३७ वर्षीय रायडू जगन मोहन रेड्डीच्या पक्षात सामील झाला आहे. निवृत्ती घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर गुरूवारी अधिकृतपणे पक्षात सामील झाला आहे.


अंबाती रायडूने श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. रायडूने अशा वेळेस पक्षात प्रवेश केला जेव्हा सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. अशातच सवाल केला जात आहे की पक्ष त्याला लोकसभा निवडणुकीचे तिकीट देणार का?



गुंटूर जिल्ह्याच्या प्रत्येक विभागाचा केला दौरा


रायडूने आपला शेवटचा क्रिकेट सामना २९ मेला इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. राजकारणात येण्याआधी त्याने आपला मुद्दा समजण्यासाठी आपला मूळ गुंटूर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणचा दौरा केला आणि लोकांची भेट घेतली.



राजकारणात येण्याचे दिले होते संकेत


मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने बुधवारी मीडियाला सांगितले होते, मी लोकांची सेवा करण्यासाठी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करेन. राजकारणात येण्याआधी मी लोकांची नस ओळखण्याचा आणि त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.



भारतासाठी खेळले ५५ वनडे सामने


रायडूने भारताकडून ५५ वनडे सामने खेळते. या दरम्यान त्याने ४७हून अधिक सरासरीने १६९४ धावा केल्या. वनडेत रायडूने ३ शतके आणि १० अर्धशतके ठोकली. सोबतच त्याच्या नावावर ३ विकेटही आहेत. तर ६ टी-२० सामन्यात रायडूने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १०.५०च्या सरासरीने ४२ धावा केल्या. याशिवाय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रायडूने ६१५१ धावा केल्या तर लिस्ट ए मध्ये ५६०७ धावा केल्या.

Comments
Add Comment

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट