राजकारणाच्या पिचवर उतरला अंबाती रायडू, जगन मोहन रेड्डींचा पक्ष YSR काँग्रेसमध्ये झाला सामील

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर अंबाती रायडूने(ambati raydu) आंध्र प्रदेशच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. ३७ वर्षीय रायडू जगन मोहन रेड्डीच्या पक्षात सामील झाला आहे. निवृत्ती घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर गुरूवारी अधिकृतपणे पक्षात सामील झाला आहे.


अंबाती रायडूने श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. रायडूने अशा वेळेस पक्षात प्रवेश केला जेव्हा सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. अशातच सवाल केला जात आहे की पक्ष त्याला लोकसभा निवडणुकीचे तिकीट देणार का?



गुंटूर जिल्ह्याच्या प्रत्येक विभागाचा केला दौरा


रायडूने आपला शेवटचा क्रिकेट सामना २९ मेला इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. राजकारणात येण्याआधी त्याने आपला मुद्दा समजण्यासाठी आपला मूळ गुंटूर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणचा दौरा केला आणि लोकांची भेट घेतली.



राजकारणात येण्याचे दिले होते संकेत


मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने बुधवारी मीडियाला सांगितले होते, मी लोकांची सेवा करण्यासाठी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करेन. राजकारणात येण्याआधी मी लोकांची नस ओळखण्याचा आणि त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.



भारतासाठी खेळले ५५ वनडे सामने


रायडूने भारताकडून ५५ वनडे सामने खेळते. या दरम्यान त्याने ४७हून अधिक सरासरीने १६९४ धावा केल्या. वनडेत रायडूने ३ शतके आणि १० अर्धशतके ठोकली. सोबतच त्याच्या नावावर ३ विकेटही आहेत. तर ६ टी-२० सामन्यात रायडूने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १०.५०च्या सरासरीने ४२ धावा केल्या. याशिवाय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रायडूने ६१५१ धावा केल्या तर लिस्ट ए मध्ये ५६०७ धावा केल्या.

Comments
Add Comment

देशद्रोही आणि नक्षलवादी पकडण्यासाठी NIA ची धडक कावाई, पाच राज्यांमध्ये धाडी

नवी दिल्ली : देशद्रोही आणि नक्षलवादी तसेच त्यांचे सहकारी पकडण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने

Punjab News : रावी, सतलज आणि चिनाब नद्यांचं रौद्ररूप! ४ कोटी लोकांवर जीवघेणं संकट, ५६ जणांचा बळी...

अमृतसर : पाकिस्तानमधील रावी, सतलज आणि चिनाब या नद्यांना आलेल्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांच्या पगारात २०० टक्के वाढ

३० हजारांचा पगार थेट होणार ९० हजार लखनऊ (वृत्तसंस्था) : एक ऐतिहासिक निर्णय घेत, उत्तर प्रदेश सरकारने श्री काशी

भटक्या कुत्र्यांची दहशत; महिलेवर जीवघेणा हल्ला, ज्येष्ठ नागरिकाला आणि चार मुलांना केले जखमी

बंगळुरू : कर्नाटकमधील होन्नाली तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. तुमकुरु जिल्ह्यात गुब्बी

हिंदूंना एकत्र करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी पदयात्रा: धीरेंद्र शास्त्री

आग्रा (उत्तर प्रदेश) : आध्यात्मिक नेते धीरेंद्र शास्त्री यांनी आज सांगितले की, हिंदूंना एकत्र करण्यासाठी, हिंदू

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार 'SIR': निवडणूक आयोगाची दिल्लीत महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चेत आलेल्या एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीचा आता संपूर्ण देशभरात एकाच