राजकारणाच्या पिचवर उतरला अंबाती रायडू, जगन मोहन रेड्डींचा पक्ष YSR काँग्रेसमध्ये झाला सामील

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर अंबाती रायडूने(ambati raydu) आंध्र प्रदेशच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. ३७ वर्षीय रायडू जगन मोहन रेड्डीच्या पक्षात सामील झाला आहे. निवृत्ती घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर गुरूवारी अधिकृतपणे पक्षात सामील झाला आहे.


अंबाती रायडूने श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. रायडूने अशा वेळेस पक्षात प्रवेश केला जेव्हा सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. अशातच सवाल केला जात आहे की पक्ष त्याला लोकसभा निवडणुकीचे तिकीट देणार का?



गुंटूर जिल्ह्याच्या प्रत्येक विभागाचा केला दौरा


रायडूने आपला शेवटचा क्रिकेट सामना २९ मेला इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. राजकारणात येण्याआधी त्याने आपला मुद्दा समजण्यासाठी आपला मूळ गुंटूर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणचा दौरा केला आणि लोकांची भेट घेतली.



राजकारणात येण्याचे दिले होते संकेत


मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने बुधवारी मीडियाला सांगितले होते, मी लोकांची सेवा करण्यासाठी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करेन. राजकारणात येण्याआधी मी लोकांची नस ओळखण्याचा आणि त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.



भारतासाठी खेळले ५५ वनडे सामने


रायडूने भारताकडून ५५ वनडे सामने खेळते. या दरम्यान त्याने ४७हून अधिक सरासरीने १६९४ धावा केल्या. वनडेत रायडूने ३ शतके आणि १० अर्धशतके ठोकली. सोबतच त्याच्या नावावर ३ विकेटही आहेत. तर ६ टी-२० सामन्यात रायडूने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १०.५०च्या सरासरीने ४२ धावा केल्या. याशिवाय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रायडूने ६१५१ धावा केल्या तर लिस्ट ए मध्ये ५६०७ धावा केल्या.

Comments
Add Comment

दिल्लीसह चार राज्यांत सतर्कतेचा इशारा; २६ जानेवारीआधी सुरक्षायंत्रणा अलर्ट मोडवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३