राजकारणाच्या पिचवर उतरला अंबाती रायडू, जगन मोहन रेड्डींचा पक्ष YSR काँग्रेसमध्ये झाला सामील

  115

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर अंबाती रायडूने(ambati raydu) आंध्र प्रदेशच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. ३७ वर्षीय रायडू जगन मोहन रेड्डीच्या पक्षात सामील झाला आहे. निवृत्ती घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर गुरूवारी अधिकृतपणे पक्षात सामील झाला आहे.


अंबाती रायडूने श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. रायडूने अशा वेळेस पक्षात प्रवेश केला जेव्हा सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. अशातच सवाल केला जात आहे की पक्ष त्याला लोकसभा निवडणुकीचे तिकीट देणार का?



गुंटूर जिल्ह्याच्या प्रत्येक विभागाचा केला दौरा


रायडूने आपला शेवटचा क्रिकेट सामना २९ मेला इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. राजकारणात येण्याआधी त्याने आपला मुद्दा समजण्यासाठी आपला मूळ गुंटूर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणचा दौरा केला आणि लोकांची भेट घेतली.



राजकारणात येण्याचे दिले होते संकेत


मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने बुधवारी मीडियाला सांगितले होते, मी लोकांची सेवा करण्यासाठी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करेन. राजकारणात येण्याआधी मी लोकांची नस ओळखण्याचा आणि त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.



भारतासाठी खेळले ५५ वनडे सामने


रायडूने भारताकडून ५५ वनडे सामने खेळते. या दरम्यान त्याने ४७हून अधिक सरासरीने १६९४ धावा केल्या. वनडेत रायडूने ३ शतके आणि १० अर्धशतके ठोकली. सोबतच त्याच्या नावावर ३ विकेटही आहेत. तर ६ टी-२० सामन्यात रायडूने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १०.५०च्या सरासरीने ४२ धावा केल्या. याशिवाय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रायडूने ६१५१ धावा केल्या तर लिस्ट ए मध्ये ५६०७ धावा केल्या.

Comments
Add Comment

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन