Hasan Mushrif : झक मारली खासदार झालो; यांच्यामुळे माझ्या सिनेकरिअरला ब्रेक लागला

अजितदादांनंतर हसन मुश्रीफांनीही केला अमोल कोल्हेंविषयी गौप्यस्फोट


मुंबई : एक अभिनेता असल्यामुळे राजकीय गोष्टींचा परिणाम होऊन त्यांच्या सिनेमाच्या आर्थिक गोष्टी बिघडत आहेत, सिनेमा चालत नाही म्हणून मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ते मला म्हणाले होते, असं नाव न घेता अमोल कोल्हेंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याआधी म्हणाले होते. आता तर अजित पवार यांनी पुणे दौऱ्यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हेंविरोधात (Amol Kolhe) आमचा उमेदवार उभा करणार आणि कोल्हेंना शिरुर मतदारसंघात पाडणार म्हणजे पाडणारच असं वक्तव्य केलं.


यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी देखील अमोल कोल्हेंविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही', असं खासदार अमोल कोल्हे यांनी मला अनेकदा सांगितलं आहे. माझ्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा शिक्का बसला आहे. खासदारकीचा परिणाम माझ्या कामावर होतोय. झक मारली खासदार झालो; यांच्यामुळे माझ्या सिनेकरिअरला ब्रेक लागला, असं ते मला अनेकदा खासगीत म्हणाले आहेत, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास