Hasan Mushrif : झक मारली खासदार झालो; यांच्यामुळे माझ्या सिनेकरिअरला ब्रेक लागला

अजितदादांनंतर हसन मुश्रीफांनीही केला अमोल कोल्हेंविषयी गौप्यस्फोट


मुंबई : एक अभिनेता असल्यामुळे राजकीय गोष्टींचा परिणाम होऊन त्यांच्या सिनेमाच्या आर्थिक गोष्टी बिघडत आहेत, सिनेमा चालत नाही म्हणून मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ते मला म्हणाले होते, असं नाव न घेता अमोल कोल्हेंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याआधी म्हणाले होते. आता तर अजित पवार यांनी पुणे दौऱ्यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हेंविरोधात (Amol Kolhe) आमचा उमेदवार उभा करणार आणि कोल्हेंना शिरुर मतदारसंघात पाडणार म्हणजे पाडणारच असं वक्तव्य केलं.


यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी देखील अमोल कोल्हेंविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही', असं खासदार अमोल कोल्हे यांनी मला अनेकदा सांगितलं आहे. माझ्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा शिक्का बसला आहे. खासदारकीचा परिणाम माझ्या कामावर होतोय. झक मारली खासदार झालो; यांच्यामुळे माझ्या सिनेकरिअरला ब्रेक लागला, असं ते मला अनेकदा खासगीत म्हणाले आहेत, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Comments
Add Comment

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने

महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत ५४ सामंजस्य करार  करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मितीत