पिंपरणे पुलावरून बस कोसळली; सुदैवाने जीवीत हानी नाही

  63

संगमनेर : संगमनेर ते कोळेवाडी गाडी नंबर एम एच ०७ सी ९१४६ ही एसटी बस कोळेवाडी या ठिकाणी मुक्कामी गेली होती. ती पुन्हा सकाळी संगमनेरकडे खांबा वरवंडी शिबलापुर हंगेवाडी मार्गे संगमनेरला जात असताना पिंपरणे पुलावरून खाली कोसळली. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही, प्रवासी किरकोळ जखमी झाले. नशीब बलवत्तर जवळच असलेल्या ट्रान्सफरवर बस कोसळली नाही, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.


सदरची घटना सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. बस चालक मनोहर गागरे, कंडक्टर एस एस बर्डे हे दोघे किरकोळ जखमी झाले. एसटी बस कोसळली त्यावेळेस बस मध्ये ७० च्या आसपास प्रवासी प्रवास करत होते. ४७ प्रवासी तिकीटधारी पासवाले १५ ते २० असतील एस एस बर्डे यांनी सांगितले आहे.


यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली व जखमीची चौकशी केली. जखमींना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्तांना गावातील तरुण, पोलीस पाटील विनोद साळवे, सरपंच नारायण मरभळ, मंज्याबापू साळवे, संदीप साळवे, ऋषी साळवे, संजय बागुल, राजहंस संघाचे संचालक रवींद्र रोहम, गोकुळ काळे, निलेश बागुल, वाहक अरुण वाकचौरे व ग्रामस्थांनी मदत केली.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली