पिंपरणे पुलावरून बस कोसळली; सुदैवाने जीवीत हानी नाही

  68

संगमनेर : संगमनेर ते कोळेवाडी गाडी नंबर एम एच ०७ सी ९१४६ ही एसटी बस कोळेवाडी या ठिकाणी मुक्कामी गेली होती. ती पुन्हा सकाळी संगमनेरकडे खांबा वरवंडी शिबलापुर हंगेवाडी मार्गे संगमनेरला जात असताना पिंपरणे पुलावरून खाली कोसळली. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही, प्रवासी किरकोळ जखमी झाले. नशीब बलवत्तर जवळच असलेल्या ट्रान्सफरवर बस कोसळली नाही, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.


सदरची घटना सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. बस चालक मनोहर गागरे, कंडक्टर एस एस बर्डे हे दोघे किरकोळ जखमी झाले. एसटी बस कोसळली त्यावेळेस बस मध्ये ७० च्या आसपास प्रवासी प्रवास करत होते. ४७ प्रवासी तिकीटधारी पासवाले १५ ते २० असतील एस एस बर्डे यांनी सांगितले आहे.


यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली व जखमीची चौकशी केली. जखमींना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्तांना गावातील तरुण, पोलीस पाटील विनोद साळवे, सरपंच नारायण मरभळ, मंज्याबापू साळवे, संदीप साळवे, ऋषी साळवे, संजय बागुल, राजहंस संघाचे संचालक रवींद्र रोहम, गोकुळ काळे, निलेश बागुल, वाहक अरुण वाकचौरे व ग्रामस्थांनी मदत केली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या