उंबर्डे सरपंच महेश पाटील राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

पेण : पेण तालुक्यातील उंबर्डे गावचे सरपंच महेश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने अहमदनगर येथे सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व सरपंचाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील नोंदणीकृत संघटना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांनी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी महेश पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उंबर्डे, पेण, रायगड यांना माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे सन्मानित करण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब पावसे, रोहीत संजय पवार, सुजाता कासार, रविंद्र पावसे, लक्ष्मण पाटील गुरुजी, रामभाऊ ठाकुर, मनोज पाटील, विजय भोईर, मुकेश पाटील, विश्वनाथ माळी, कल्पेश मोकल, निलेश पाटील, विनायक पाटील, मनोज पाटील, वसंत म्हाञे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बाबासाहेब पावसे यांनी सांगितले की, सर्व सरपंच यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन आपण गावचा विकास करण्यासाठी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नाव लौकिक मिळविला आहे. आपल्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने आपणास आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपण आपल्या पुढील काळातही असे सामाजिक व गाव हिताची कामे करण्यासाठी ईश्वर शक्ती देवो. पुढील भावी कार्यास सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू