Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात 'त्या' अधिकाऱ्याची हकालपट्टी करा

  89

आमदार नितेश राणे यांची मागणी


मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे दिशा सालियन हत्या प्रकरणात (Disha Salian murder case) आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे या प्रकरणात दोषी असून त्यांच्याविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी त्यांनी आधीपासूनच लावून धरली आहे. याची दखल घेत एसआयटी (SIT) स्थापन होऊन आता वेगाने तपासकार्य देखील सुरु आहे. मात्र, त्यातच नितेश राणे यांनी आता आणखी एका गोष्टीवर आक्षेप घेतला आहे. मालवणी पोलीस स्टेशनमधील काही पोलीस अधिकारी तपासाबद्दल त्यांच्या राजकीय बॉसला माहिती पुरवत आहेत, असा आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी नितेश राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आयुक्तांना नितेश राणे यांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 'दिशा सालियन' मृत्यू प्रकरणात मालवणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी थातुर मातुर तपास करुन बनावट क्लोझर रिपोर्ट बनवून तत्कालीन एसीपींमार्फत (ACP) प्रकरण अपघात दाखवून बंद केले होते. त्यानंतर शासनाने ते प्रकरण पुन्हा रिओपन (Re-open) करून पुढील तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. त्या एसआयटी मध्ये चुकून मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना सामील करून घेण्यात आले आहे.


उच्च न्यायालयाने या प्रकरणात ठरवून दिलेल्या कायद्यानुसार मालवणी पोलीस स्टेशनचे आधीचे दोषी अधिकारी यांच्यावर आरोप असल्यामुळे त्या पोलीस स्टेशनचा कोणताही अधिकारी केसचा तपास करू शकत नाही. त्यामुळे चिमाजी आढाव हे एसआयटी चे सदस्य राहू शकत नाही. चिमाजी आढाव हे अपात्र असूनसुद्धा एसआयटी मध्ये सदस्य असल्यामुळे चौकशी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे, असं नितेश राणे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.



नितेश राणे यांनी ट्विटद्वारे दिली होती माहिती


दिशा सालियन हत्येचा भाग असलेले काही अधिकारी अजूनही मालवणी पोलीस ठाण्यात आहेत. ते तपासावरही बारीक लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्या राजकीय बॉसला माहिती देत​आहेत. आम्हाला त्यांची नावे आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या दरम्यान केस कशी हाताळली हे सर्व माहित आहे. निष्पक्ष तपासासाठी त्यांना काढून टाकले जावे आणि तपास करण्यात यावा याची खात्री करण्यासाठी मी एसआयटीला पत्र लिहिणार आहे, अशी मागणी नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले

Shirdi Saibaba: साईबाबा मंदिरात लाखोंची चोरी, ३० वर्षांपासून सेवा देणारा मंदिर कर्मचारी अटक

शिर्डी: शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज लाखों भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून भेट देत असतात, यामुळे साईबाबाबांच्या