Dhananjay Munde Corona Positive : धनंजय मुंडे यांना झाली कोरोनाची लागण

  121

काळजी घेण्याचं केलं आवाहन


पुणे : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) अख्खं जग थांबलं होतं. देशभरात कोरोनाचे अनेक रुग्ण (Corona patients) सापडल्याने लोकांच्या मनात भीती पसरली होती. यावर आपण विजय मिळवला. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत असतानाच आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मात्र, यात घाबरण्याचं काही कारण नसून काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.


धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील ४ दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.





मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल. सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.





नवी दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. केंद्र सरकारने या राज्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे सर्वांनीच आपापल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.


Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली