Sunil Kedar : पाच वर्षांची शिक्षा ऐकून काँग्रेस मंत्री सुनील केदार यांना बसला धसका?

  207

तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखणे सुरु झाल्याने रात्री उशिरा रुग्णालयात दाखल


नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात (Nagpur Bank scam) मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. केदार लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमी शिक्षा द्यावी असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, त्याला न जुमानता कोर्ट पाच वर्षांच्या शिक्षेवर ठाम राहिले आहे. शिवाय केदार यांची आमदारकी रद्द होणार का असाही एक प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा संपूर्ण निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे असेल.


दरम्यान, शिक्षा सुनावणीनंतर न्यायालयातून सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी पोलिसांनी नियमाप्रमाणे मंत्री सुनील केदार यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेले. तेव्हा त्यांना मायग्रेनचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची त्यांनी काल तक्रार केली. त्यामुळे रात्री उशिरा त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.


डॉक्टरांनी इसीजी काढले असता थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आताचे आहेत हे डॉक्टर तपासणार आहेत. तूर्तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत अतिदक्षता विभागात केदार यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर नागपूर बँक घोटाळ्यातील इतर आरोपींना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.



काय आहे प्रकरण?


नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल काल लागला. यामध्ये सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. बँकेची रक्कम बँकेच्या परवानगीशिवाय खाजगी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवण्यात आली होती. या कंपन्या पुढे दिवाळखोरीत निघाल्या. शिवाय बँकेलाही रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. या प्रकरणात केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या