Sunil Kedar : पाच वर्षांची शिक्षा ऐकून काँग्रेस मंत्री सुनील केदार यांना बसला धसका?

तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखणे सुरु झाल्याने रात्री उशिरा रुग्णालयात दाखल


नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात (Nagpur Bank scam) मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. केदार लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमी शिक्षा द्यावी असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, त्याला न जुमानता कोर्ट पाच वर्षांच्या शिक्षेवर ठाम राहिले आहे. शिवाय केदार यांची आमदारकी रद्द होणार का असाही एक प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा संपूर्ण निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे असेल.


दरम्यान, शिक्षा सुनावणीनंतर न्यायालयातून सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी पोलिसांनी नियमाप्रमाणे मंत्री सुनील केदार यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेले. तेव्हा त्यांना मायग्रेनचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची त्यांनी काल तक्रार केली. त्यामुळे रात्री उशिरा त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.


डॉक्टरांनी इसीजी काढले असता थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आताचे आहेत हे डॉक्टर तपासणार आहेत. तूर्तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत अतिदक्षता विभागात केदार यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर नागपूर बँक घोटाळ्यातील इतर आरोपींना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.



काय आहे प्रकरण?


नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल काल लागला. यामध्ये सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. बँकेची रक्कम बँकेच्या परवानगीशिवाय खाजगी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवण्यात आली होती. या कंपन्या पुढे दिवाळखोरीत निघाल्या. शिवाय बँकेलाही रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. या प्रकरणात केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार