Sunil Kedar : पाच वर्षांची शिक्षा ऐकून काँग्रेस मंत्री सुनील केदार यांना बसला धसका?

तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखणे सुरु झाल्याने रात्री उशिरा रुग्णालयात दाखल


नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात (Nagpur Bank scam) मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. केदार लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमी शिक्षा द्यावी असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, त्याला न जुमानता कोर्ट पाच वर्षांच्या शिक्षेवर ठाम राहिले आहे. शिवाय केदार यांची आमदारकी रद्द होणार का असाही एक प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा संपूर्ण निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे असेल.


दरम्यान, शिक्षा सुनावणीनंतर न्यायालयातून सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी पोलिसांनी नियमाप्रमाणे मंत्री सुनील केदार यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेले. तेव्हा त्यांना मायग्रेनचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची त्यांनी काल तक्रार केली. त्यामुळे रात्री उशिरा त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.


डॉक्टरांनी इसीजी काढले असता थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आताचे आहेत हे डॉक्टर तपासणार आहेत. तूर्तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत अतिदक्षता विभागात केदार यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर नागपूर बँक घोटाळ्यातील इतर आरोपींना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.



काय आहे प्रकरण?


नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल काल लागला. यामध्ये सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. बँकेची रक्कम बँकेच्या परवानगीशिवाय खाजगी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवण्यात आली होती. या कंपन्या पुढे दिवाळखोरीत निघाल्या. शिवाय बँकेलाही रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. या प्रकरणात केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी