Nagpur Bank Scam : नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळ्यात काँग्रेसचे सुनील केदार दोषी!

घोटाळ्यावेळी होते बँकेचे अध्यक्ष


नागपूर : लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आल्या असताना काँग्रेसचे (Congress) एकेक घोटाळे बाहेर येत आहेत. नुकतंच काँग्रेसचे खासदार धीरज साहू (Dhiraj Sahu) यांच्याकडे मोजता येणार नाहीत इतक्या नोटा सापडल्या. ३५० कोटींहून अधिक काळा पैसा त्यांनी लपवून ठेवला होता. तर आता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळ्यात (Nagpur Bank Scam) काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टाने आज हा निकाल दिला.


कोर्टाने सुनील केदार (तत्कालीन बँक अध्यक्ष), केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी हे तीन रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी मानले आहे. दरम्यान, सध्या कोर्टात शिक्षेच्या प्रमाणावर युक्तिवाद सुरु आहे. सहा दोषींचे वकील युक्तिवाद करत आहेत.



काय आहे घोटाळा?


नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २००१-२००२ मध्ये होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खासगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी शेअर्स खरेदी केले होते. मात्र सहकार विभागाच्या कायद्यानुसार बँकेची परवानगी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती. त्यावेळी १९९९ सालापासून सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होचे. मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले शेअर्स मिळाले नाहीत, ते बँकेच्या नावाने झाले नव्हते.


धक्कादायक म्हणजे पुढे शेअर्स खरेदी करणाऱ्या या खासगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. त्यामुळे बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. या प्रकरणी सुनिल केदार आणि अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी शेअर्सही दिले नाहीत आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे.


तेव्हा गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडी कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यावर २२ नोव्हेंबर २००२ रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता. आज या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली ज्यात तत्कालीन बँकेचे अध्यक्ष सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा