माझा जरांगेंना पाठिंबा! देवसुद्धा त्यांना घाबरतो; भुजबळांचा उपरोधिक टोला

Share

नाशिक : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अशातच आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली आहे.

जरांगेंनी याआधी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात सोयरे शब्दावरून मतभेद सुरू झाले आहेत. यावरच भुजबळांनी राज्य सरकारला सल्ला देत जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका केली.

आपण आपली मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या संदर्भातील सर्व भाषणं आणि वक्तव्य मागे घेतोय आणि जरांगेंच्या मतांशी आपणही सहमत आहोत. जरांगे सरकारला वेठीस धरत नाहीत तर, सरकारच जरांगेंना वेठीस धरतेय, सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि काही मंत्र्यांना जरांगेंच्या आंदोलनस्थळी कायमस्वरुपी बंगले द्यावेत, सचिवांचे कार्यालयही तिथे उभे करावे, जेणेकरुन जरांगेंनी मागणी उच्चारली की ती तातडीने सरकारला पूर्ण करता येईल, असे म्हणत भुजबळ यांनी जरांगेंना उपरोधिक टोला लगावला आहे.

भुजबळ म्हणाले की, “जरांगेंचे ऐकायला पाहिजे. त्यांना रोज अभिनव कल्पना येतात, त्यांचा आदर राखला पाहिजे. देवसुद्धा त्यांना घाबरतो, सासू-सासऱ्यांचे मित्र सर्वांना दाखले द्या.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “माझी भुमिका अशी आहे की, जरांगे यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. सर्वांना आरक्षण द्यायला पाहिजे. नाहीतर मोर्चा घेऊन ते येतील. व्याह्याचे व्याही व्याह्याचे व्याही असे सर्वांना आरक्षण दिले पाहिजे. जे सोयरे आहेत म्हणजे पत्नीचे आई वडील आहेत त्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे. त्या आईवडिलांची दुसरी जी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. तसेच त्या मुलांचे जे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की, सरकारने वाटाघाटीचा घोळ घालू नये. ते सांगतात जरांगे बोलतील आणि त्यांच्या हातात सगळं आहे. ७ ते ८ कोटी मराठा त्यांच्या हातात आहे. ताबडतोब त्या ठिकाणी एका निवृत्त न्यायाधीशांचे कार्यालय सुरू करा आणि त्या ठिकाणी लगेच माझा जामीन रद्द करून टाका. पुढच्या मेळाव्यात त्यांच्या बाजूने मी भाषण करणार आहे. मी एकदम युटर्न घेतला आहे. सध्या जी अपात्रतेची सुनावणी सूरू आहे, त्याबाबत जरांगे यांच्याशी बोलावं आणि पटकन निर्णय घेतला जावा. उपरोधिक म्हणा, हतबलता म्हणा, काय म्हणायचं आहे ते म्हणा.”, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

3 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

23 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

55 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago