Loksabha MPs Suspended : लोकसभेतून काँग्रेसचे आणखी तीन खासदार निलंबित

आतापर्यंत एकूण १४६ खासदारांवर निलंबनाची कारवाई


नवी दिल्ली : लोकसभेत (Loksabha) दोन तरुणांनी स्मोक कँडल्स जाळून घातलेल्या गोंधळानंतर विरोधी पक्षांच्या गोंधळी खासदारांना निलंबित (MPs Suspension)करण्याचं सत्र सुरुच आहे. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी सभागृहाचा अवमान केल्या प्रकरणी काँग्रेसच्या तीन खासदारांना सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून (Winter Session) निलंबित केलं. आतापर्यंत लोकसभेचे आणि राज्यसभेचे (Rajyasabha) मिळून १४६ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


काँग्रेसचे खासदार नकुलनाथ (Nakulnath), डीके सुरेश (D K Suresh) आणि दीपक बैज (Deepak Baij) अशा तीन खासदारांना आज लोकसभेतून निलंबित केलं गेलं. आज लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास समाप्त झाल्यानंतर तीन खासदारांची नावे घेत तुम्ही सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आणत आहात, घोषणाबाजी करत आहात आणि कागदे फाडून लोकसभा कर्मचाऱ्यांवर फेकत आहात. हे कृत्य सभागृहाच्या मर्यादेविरोधात असल्याचे सांगत लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली.



लोकसभा अध्यक्ष काय म्हणाले?


घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांवर लोकसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “मला कोणत्याही सदस्याला विनाकारण निलंबित करायचे नाही. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुम्हाला इथे चर्चा करण्याचा आणि तुमचे मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोक तुमच्या जागेवर जा, मी तुम्हाला शून्य तासात तुमचे मत मांडण्याची संधी देईन. ही पद्धत योग्य आहे का? हीच सभागृहाची प्रतिष्ठा आहे का? हे योग्य नसल्याचे लोकसभा अध्यक्षांनी म्हटले.



आतापर्यंत कशी झाली निलंबनाची कारवाई?


संसदेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केल्यानंतर १४ डिसेंबरपासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू झाली. १४ डिसेंबरला विरोधी बाकांवरील १३ खासदार, १८ डिसेंबर रोजी ३३ खासदार, १९ डिसेंबरला ४९ खासदार आणि २० डिसेंबरला दोन खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्याचवेळी १४ डिसेंबरला राज्यसभेतून ४५ आणि १८ डिसेंबरला एका खासदाराला निलंबित करण्यात आलं होतं.


Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे