School picnic Accident : शाळेच्या सहलीच्या बसला भीषण अपघात!

एका शिक्षकाचा मृत्यू तर विद्यार्थी जखमी


इंदापूर : शाळेची सहल म्हटली की विद्यार्थी प्रचंड उत्सुक आणि उत्साहात असतात. मात्र, त्यांच्या आनंदावर विरजण घालणारी एक धक्कादायक घटना सोलापूरमध्ये (Solapur) घडली आहे. सहलीनिमित्त (Picnic) गेलेल्या शाळेच्या बसचा भीषण अपघात (School Bus Accident) झाला आहे. यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज पहाटे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ हा अपघात घडला.


सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल निघाली होती. कोकण दर्शनासाठी (Konkan Darshan) ही मुलं गेली होती. मात्र, गणपतीपुळे येथून आज पहाटे सहल परतत असताना अकलूजमधील माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत सहलीच्या बसची एका टेम्पोला जोरदार धडक बसली. या टेम्पोमधून बांबूची वाहतूक करण्यात येत होती. टेम्पो पंक्चर झाल्याने एका अवघड वळणावर थांबला होता. याच अवघड वळणावर टेम्पोला सहलीच्या बसची धडक बसली आणि अपघात घडला.


अपघातावेळी बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. या अपघातात एका शिक्षकाला जीव गमवावा लागला आहे. तर जखमी झालेल्या इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा