School picnic Accident : शाळेच्या सहलीच्या बसला भीषण अपघात!

एका शिक्षकाचा मृत्यू तर विद्यार्थी जखमी


इंदापूर : शाळेची सहल म्हटली की विद्यार्थी प्रचंड उत्सुक आणि उत्साहात असतात. मात्र, त्यांच्या आनंदावर विरजण घालणारी एक धक्कादायक घटना सोलापूरमध्ये (Solapur) घडली आहे. सहलीनिमित्त (Picnic) गेलेल्या शाळेच्या बसचा भीषण अपघात (School Bus Accident) झाला आहे. यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज पहाटे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ हा अपघात घडला.


सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल निघाली होती. कोकण दर्शनासाठी (Konkan Darshan) ही मुलं गेली होती. मात्र, गणपतीपुळे येथून आज पहाटे सहल परतत असताना अकलूजमधील माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत सहलीच्या बसची एका टेम्पोला जोरदार धडक बसली. या टेम्पोमधून बांबूची वाहतूक करण्यात येत होती. टेम्पो पंक्चर झाल्याने एका अवघड वळणावर थांबला होता. याच अवघड वळणावर टेम्पोला सहलीच्या बसची धडक बसली आणि अपघात घडला.


अपघातावेळी बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. या अपघातात एका शिक्षकाला जीव गमवावा लागला आहे. तर जखमी झालेल्या इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला, ६५ जण जखमी

पुणे : राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर

संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ

Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न