School picnic Accident : शाळेच्या सहलीच्या बसला भीषण अपघात!

एका शिक्षकाचा मृत्यू तर विद्यार्थी जखमी


इंदापूर : शाळेची सहल म्हटली की विद्यार्थी प्रचंड उत्सुक आणि उत्साहात असतात. मात्र, त्यांच्या आनंदावर विरजण घालणारी एक धक्कादायक घटना सोलापूरमध्ये (Solapur) घडली आहे. सहलीनिमित्त (Picnic) गेलेल्या शाळेच्या बसचा भीषण अपघात (School Bus Accident) झाला आहे. यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज पहाटे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ हा अपघात घडला.


सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल निघाली होती. कोकण दर्शनासाठी (Konkan Darshan) ही मुलं गेली होती. मात्र, गणपतीपुळे येथून आज पहाटे सहल परतत असताना अकलूजमधील माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत सहलीच्या बसची एका टेम्पोला जोरदार धडक बसली. या टेम्पोमधून बांबूची वाहतूक करण्यात येत होती. टेम्पो पंक्चर झाल्याने एका अवघड वळणावर थांबला होता. याच अवघड वळणावर टेम्पोला सहलीच्या बसची धडक बसली आणि अपघात घडला.


अपघातावेळी बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. या अपघातात एका शिक्षकाला जीव गमवावा लागला आहे. तर जखमी झालेल्या इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह