इगतपुरी-कसारा घाट क्षेत्रातील प्रस्तावित रेल्वे लाईनच्या सर्व्हेक्षणासाठी संसदेत आवाज!

Share
चौथ्या आणि पाचव्या लाईनच्या सर्व्हेक्षणाचे काम तातडीने करण्याची खासदार गोडसे यांची मागणी

नाशिक : मुंबई-नाशिक या दरम्यानचा प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आज खासदार गोडसे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून अवघ्या सभागृहाचे लक्ष वेधले.

मुंबई ते नाशिक या दरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना अडचणीचा ठरणाऱ्या इगतपुरी-कसारा या दरम्यानच्या घाट परिसरातील प्रस्तावित चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनच्या सर्व्हेक्षणाच्या कामाची प्रगती कोणत्या स्तरावर आहे असा सवाल करत प्रवाशांच्या वेळची बचत होणेकामी तातडीने चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार गोडसे यांनी केली आहे.

मुंबईकडून नाशिकला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाडयांना इगतपुरी ते कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावरूनच धावावे लागते. इगतपुरी ते कसारा हे १६ कि.मी. चे अंतर असून या दरम्यानच्या घाट परिसरांत पूर्वीपासून असलेले टनल हे कमी व्यासाचे आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांना वाढीव इंजिन ,बॅकर्स लावण्याची गरज असते. परिणामी इगतपूरी – कसारा या दरम्यानच्या घाट परिसरात सतत रेल्वेगाडया थांबवाव्या लागत असल्याने प्रवासास विलंब होतो. याबरोबरच बँकरवर मोठा खर्चही होतो. यावर उपाय म्हणून कसारा ते इगतपुरी या दरम्यानच्या रेल्वेलाईनची चढाई कमी व्हावी आणि चौथ्या व पाचव्या रेल्वे लाईनच्या कामाला प्रारंभ व्हावा यासाठी खा. गोडसे यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे.

इगतपुरी -कसारा या दरम्यानच्या घाट परिसरातून सुमारे दिडशे मालगाडया आणि प्रवासी रेल्वे गाडया धावतात. उंच घाट असल्याने सर्वच रेल्वे गाडया कमी वेगाने चालतात. यातून प्रवाशांना दिलासा मिळावा तसेच प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी खा. गोडसे यांनी आज थेट संसदेतच आवाज उठवला. मुंबई -नाशिक या दरम्यानच्या प्रवासासाठी कसारा घाट हा मुख्य अढथळा आहे. स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली असली तरी घाट परिसरातील परिस्थितीत बदल झालेला नसल्याचे खा. गोडसे यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले. इगतपुरी – कसारा या दरम्यानच्या घाट परिसरातील प्रस्तावित चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनच्या सर्वक्षणाचे कामाची प्रगती कोणत्या स्तरावर आहे असा सवाल करत प्रवाशांच्या वेळची बचत होणेकामी तातडीने चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून कामाला प्रारंभ करावा अशी आग्रही मागणी खा.गोडसे यांनी केली आहे.दरम्यान कसारा घाट हा देशातील सर्वात मोठया चढाईच्या घाटांपैकी एक घाट असून घाट १:३७ ग्रेडीयंटचा आहे. घाटाची चढाई कमीत कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनचे सर्व्हेक्षण आणि डिझाईनचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. गोडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

31 minutes ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

1 hour ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

3 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

4 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

4 hours ago