मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली! एक्यूआय १९०च्या पुढे पोहोचला

मुंबई : मुंबईच्या हवेत (Mumbai Weather) गारठा वाढला असला तरी त्यासोबतच आता चिंतेत देखील वाढ झाली आहे. मुंबईच्या हवेचा निर्देशांक सोमवारी मध्यम असला तरी वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता (Pollution) वाईट या प्रकारात नोंदवली गेली आहे.


मंगळवारीही मुंबईतील काही केंद्रांवरील हवा वाईट असेल, असा अंदाज सफर या संस्थेच्या माध्यमातून नोंदवण्यात आला आहे. मुंबईच्या हवेतील प्रदुषणात वाढ झाली असल्यामुळे नागरिकांनादेखील आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सोमवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १९० हून पुढे पोहोचला होता. कुलाबा येथे सोमवारी किमान तापमान २४ तर सांताक्रूझ येथे २३.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. दोन्ही केंद्रांवर रविवारपेक्षा किमान तापमान अधिक होते.


मुंबईच्या या दोन्ही केंद्रांवर किमान तापमान वाढले असले तरी मुंबईच्या काही भागांमध्ये मात्र थंडी जाणवत आहे. यासोबतच हवेत धुक्याचे प्रमाण देखील वाढले आहे. धुक्यामुळे मुंबईच्या वातावरणामध्ये प्रदूषके साचून राहण्याचे प्रमाण येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.


सध्या मुंबईमध्ये वाऱ्यांचा वेग संथ असल्याने सकाळच्या वेळी प्रदूषके अधिक साचून राहतात, अशी माहिती सफरचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन घुगे यांनी दिली.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार सोमवारी महापे, कांदिवली, शीव, बोरिवली, वरळी, मुलुंड, पवई, कुलाबा, कल्याण, वसई, मुंबई विमानतळ येथे हवेची गुणवत्ता मध्यम नोंदली गेली. तर नेरूळ येथे समाधानकारक नोंदली गेली.

Comments
Add Comment

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये

मुंबईत २२ वर्षांत कुठे आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग

इमारतींना ओसी, पण प्रत्यक्षात सत्ताकाळात उबाठाला अंमलबजावणी करण्यात अपयश उबाठ- मनसेचा वचननामा, आमचा

दोन माजी बेस्ट समिती अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवलेले दोन माजी नगरसेवक यंदा पालिका निवडणुकीच्या रिंगणात

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास टोल-फ्री समुपदेशन!

मुंबई (प्रतिनिधी) : सीबीएसईने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक व सामाजिक समुपदेशन सेवा सुरू

मुंबईकरांच्या सेवेत १८ डब्यांची लोकल लवकरच!

विरार-डहाणू रोड सेक्शनवर १४-१५ जानेवारीला चाचणी मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरून प्रवास