अन्न व औषध प्रशासनाचा भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा

नाशिक : ग्राहकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थाबाबत धडक मोहिम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून दि. १७ रोजी अन्न व औषध प्रशासनाचे पथक संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून कार्यालयास प्राप्त गुप्त माहितीच्या अनुषंगे पथकाने अशोक जीतलाल यादव, मे. तिस्ता क्रोप केअर प्रा.लि., मोरे मळा, लक्ष्मण टाउनशिप, अंबड लिंक रोड, सिडको, नाशिक या उत्पादक कारखान्याची तपासणी केली असता तेथे रिफाईन्ड पामोलिन ऑईल, unknown white solid flakes (adulterant) चा वापर करून पनीर अन्नपदार्थ बनवित असल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथून पनीर, रिफाईन्ड पामोलिन ऑईल, unknown white solid flakes (adulterant) व मिक्स मिल्क या अन्नपदार्थाचे नमुने घेवून पनीरचा 194 किलो; किंमत रु.46,560/-, रिफाईन्ड पामोलिन ऑईलचा 88 किलो, किंमत रु.14,960/-, व मिक्स मिल्कचा 1498 लिटर, किंमत रु.44,940/- असा एकूण किंमत रु.1,06,460/- किंमतीचा साठा जप्त करण्यात येवून व्यापक जनहिताच्या दृष्टिले पनीर, व मिक्स मिल्काचा साठा नष्ट करण्यात आलेला आहे तर रिफाईन्ड पामोलिन ऑईलचा साठा अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.



ताब्यात घेतलेले चारही अन्न नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांचेकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल.


सदरची कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) म.मो.सानप यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी यो. रो. देशमुख, गोपाल कासार, नमुना सहायक विजय पगारे यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे.


हॉटेल व्यावसायिकांनी भेसळयुक्त पनीरचा वापर अन्नपदार्थ बनविणेसाठी करु नये. नागरिकांना अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत काहीही संशय असल्यास प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले