लोकसभेनंतर राज्यसभेचे ४५ खासदार निलंबित, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल यांच्या नावाचा समावेश

नवी दिल्ली: लोकसभेनंतर(loksabha) राज्यसभेचे(rajyasabha) ४५ विरोधी पक्षातील खासदारांचे सोमवारी निलंबन करण्यात आले. निलंबित केलेल्या खासदारांमध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, रामनाथ ठाकूर, मनोज झा, रामगोपाल यादव, जावेद अली खान, महुआ माजी आणि शांतनू सेन आहेत.


सोबतच निलंबित केलेल्या खासदारांच्या यादीत समीरूल इस्लाम, फैयाज अहमद, अजित कुमार, ननरायन भाई जेठवा, रंजीत रंजन, रणदीप सुरजेवाला, रजनी पाटिल, एम संगम्म, अमी याग्निक, फुलो देवी नेताम आणि मौसन नूर आहेत. या ४५ खासदारांपैकी ३४ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत आणि ११ खासदारांना प्रिव्हिलेज कमिटीचा रिपोर्ट येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.



निलंबनाचे काय आहे कारण?


राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड याबाबत म्हणाले, काही खासदारांनी सभागृहात गदारोळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. या कारणामुळे अनेक खासदारांना सदनातून निलंबित करण्यात आले आहे.



लोकसभेतून हे खासदार निलंबित


याआधी लोकसभेतून ३३ विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यातील ३० सदस्यांना हिवाळी अधिवेशनाचा उरलेला कालावधी तर तीन इतर सदस्यांना विशेषाधिकार समितीचा रिपोर्ट येईपर्यंत निलंबित करण्यात आले.


अधीर रंजन चौधरी, अपूर्वा पोद्दार, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॉय, शताब्दी रॉय, असिथ कुमार मल, कौशलेंद्र कुमार, एनटो एंटनी, एसएस पलनामनिक्कम, तिरूवरूस्कर, प्रतिमा मंडल, काकोली घोष,के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस राम लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेलवम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमती. के नवासकानी आणि टी आर बालूला निलंबित करण्यात आले.

Comments
Add Comment

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच