लोकसभेनंतर राज्यसभेचे ४५ खासदार निलंबित, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल यांच्या नावाचा समावेश

Share

नवी दिल्ली: लोकसभेनंतर(loksabha) राज्यसभेचे(rajyasabha) ४५ विरोधी पक्षातील खासदारांचे सोमवारी निलंबन करण्यात आले. निलंबित केलेल्या खासदारांमध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, रामनाथ ठाकूर, मनोज झा, रामगोपाल यादव, जावेद अली खान, महुआ माजी आणि शांतनू सेन आहेत.

सोबतच निलंबित केलेल्या खासदारांच्या यादीत समीरूल इस्लाम, फैयाज अहमद, अजित कुमार, ननरायन भाई जेठवा, रंजीत रंजन, रणदीप सुरजेवाला, रजनी पाटिल, एम संगम्म, अमी याग्निक, फुलो देवी नेताम आणि मौसन नूर आहेत. या ४५ खासदारांपैकी ३४ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत आणि ११ खासदारांना प्रिव्हिलेज कमिटीचा रिपोर्ट येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

निलंबनाचे काय आहे कारण?

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड याबाबत म्हणाले, काही खासदारांनी सभागृहात गदारोळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. या कारणामुळे अनेक खासदारांना सदनातून निलंबित करण्यात आले आहे.

लोकसभेतून हे खासदार निलंबित

याआधी लोकसभेतून ३३ विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यातील ३० सदस्यांना हिवाळी अधिवेशनाचा उरलेला कालावधी तर तीन इतर सदस्यांना विशेषाधिकार समितीचा रिपोर्ट येईपर्यंत निलंबित करण्यात आले.

अधीर रंजन चौधरी, अपूर्वा पोद्दार, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॉय, शताब्दी रॉय, असिथ कुमार मल, कौशलेंद्र कुमार, एनटो एंटनी, एसएस पलनामनिक्कम, तिरूवरूस्कर, प्रतिमा मंडल, काकोली घोष,के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस राम लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेलवम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमती. के नवासकानी आणि टी आर बालूला निलंबित करण्यात आले.

Recent Posts

Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध!

मुंबई  : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…

25 minutes ago

Electric Vehicles : महाराष्ट्र दिनापासून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

मुंबई  : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…

31 minutes ago

वेळेच्या नियोजनासाठी घड्याळाची गरज

रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…

45 minutes ago

Mumbai : पारंपारिक पाणी साचण्याच्या ठिकाणांचा अभ्यास करा

मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…

48 minutes ago

MP Narayan Rane : ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी मा.खा. नारायण राणेंचा पुढाकार

मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…

49 minutes ago

ड्रोन कॅमेऱ्याने सुसज्ज दीदी

रियास बाबू टी नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय…

53 minutes ago