लोकसभेनंतर राज्यसभेचे ४५ खासदार निलंबित, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल यांच्या नावाचा समावेश

नवी दिल्ली: लोकसभेनंतर(loksabha) राज्यसभेचे(rajyasabha) ४५ विरोधी पक्षातील खासदारांचे सोमवारी निलंबन करण्यात आले. निलंबित केलेल्या खासदारांमध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, रामनाथ ठाकूर, मनोज झा, रामगोपाल यादव, जावेद अली खान, महुआ माजी आणि शांतनू सेन आहेत.


सोबतच निलंबित केलेल्या खासदारांच्या यादीत समीरूल इस्लाम, फैयाज अहमद, अजित कुमार, ननरायन भाई जेठवा, रंजीत रंजन, रणदीप सुरजेवाला, रजनी पाटिल, एम संगम्म, अमी याग्निक, फुलो देवी नेताम आणि मौसन नूर आहेत. या ४५ खासदारांपैकी ३४ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत आणि ११ खासदारांना प्रिव्हिलेज कमिटीचा रिपोर्ट येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.



निलंबनाचे काय आहे कारण?


राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड याबाबत म्हणाले, काही खासदारांनी सभागृहात गदारोळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. या कारणामुळे अनेक खासदारांना सदनातून निलंबित करण्यात आले आहे.



लोकसभेतून हे खासदार निलंबित


याआधी लोकसभेतून ३३ विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यातील ३० सदस्यांना हिवाळी अधिवेशनाचा उरलेला कालावधी तर तीन इतर सदस्यांना विशेषाधिकार समितीचा रिपोर्ट येईपर्यंत निलंबित करण्यात आले.


अधीर रंजन चौधरी, अपूर्वा पोद्दार, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॉय, शताब्दी रॉय, असिथ कुमार मल, कौशलेंद्र कुमार, एनटो एंटनी, एसएस पलनामनिक्कम, तिरूवरूस्कर, प्रतिमा मंडल, काकोली घोष,के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस राम लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेलवम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमती. के नवासकानी आणि टी आर बालूला निलंबित करण्यात आले.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला