Maratha Reservation : उद्धव ठाकरेंची बैठक मराठा कार्यकर्त्यांनी उधळून लावली

  59

दौर्‍याच्या अनुषंगाने नांदेड येथे आयोजित केली होती बैठक


नांदेड : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज नांदेड (Nanded) दौर्‍यावर आहेत. त्यानिमित्ताने उबाठा गटाची नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज्यभरात मराठा आंदोलकांनी (Maratha activists) आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतीही बैठक किंवा कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांबाबत मराठा आंदोलकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. त्यातूनच आज उबाठाची बैठकही उधळून लावण्यात आली.


मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरात पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी गावबंदीचा निर्णय काही दिवसांसाठी शिथिल केला आहे. तरीही राजकीय कार्यक्रमांवरचा बहिष्कार कायम आहे. उद्धव ठाकरेंच्या नांदेड दौऱ्यासाठी आज शासकीय विश्रामगृह येथे दुपारी उबाठा गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू असताना मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत ही बैठक उधळून लावली. मराठ्यांचा रोष पाहून उबाठाच्या कार्यकर्त्यांनाही ताबडतोब कक्ष खाली करावा लागला.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात अजूनही ठिकठिकाणी आंदोलन सुरूच आहेत. नांदेड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी साखळी उपोषण सुरु आहे. सोबतच, आज जालना येथील आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला जिल्ह्यातील काही मराठा आंदोलक हजर राहणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक असल्याचे दिसत आहे. तर, आंतरवाली सराटी येथील आजच्या बैठकीनंतर जिल्ह्यातील पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती