Gaurav More : गौरव मोरेने सोडली हास्यजत्रा? हल्ली स्किटमध्ये दिसत का नाही?

भार्गवी चिरमुलेसोबतच्या पॉडकास्टमध्ये गौरवने केला खुलासा


मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरे (Gaurav More) गेल्या काही एपिसोड्समध्ये दिसला नाही. या कार्यक्रमाने गौरवला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्याची कॉमेडी, स्किटमध्ये सतत मार खाणं हे चाहत्यांना भलतंच आवडतं. त्यातही स्किटमध्ये गौरवने खोटा माज करत सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांना उलट बोलणं, मोठा सिनेमा मिळाल्यामुळे हास्यजत्रा सोडून जायच्या खोट्या धमक्या देत लोकांना हसवणं प्रेक्षकांना विशेष आवडतं. मात्र, हीच मस्करी करता करता गौरवने खरंच कार्यक्रम सोडला की काय असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. ही शंका आता स्वतः गौरव मोरेने दूर केली आहे.


अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या (Bhargavi Chirmuley) गप्पामस्ती या पॉडकास्ट शोमध्ये तिने गौरवला निमंत्रित केलं होतं. यावेळेस 'तू हल्ली हास्यजत्रेत दिसत नाहीस, तू हास्यजत्रा सोडलीस की काय?' असा प्रश्न तिने विचारला. यावर गौरव म्हणाला, “हा कार्यक्रम मी सोडलेला नाही. माझ्या खांद्याला दुखापत झाली असल्याने मी थोडे दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे.”


गौरव मोरे पुढे म्हणाला, “सध्या या दुखापतीमुळे मी दोन ते तीन महिन्यांच्या ब्रेकवर आहे. कारण, एखादं स्किट सादर करताना ओढाताण होते. माझे स्किट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता माहितीच असेल की, माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड असते. सतत हालचाल केल्यामुळे खांदा अधिक दुखावू शकतो. हेच हास्यजत्रेतून ब्रेक घेण्याचं मूळ कारण आहे. याशिवाय या दरम्यान माझ्या एका सिनेमाचं शूटिंग सुद्धा होतं. त्याच्यासाठी मला ३० ते ३५ दिवसांचा वेळ काढावा लागणार आहे.”


“दुखापत आणि सलग शूटिंग या दोन कारणांमुळे मी काही दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे. तीन महिन्यांचा ब्रेक घेतो असं मी सरांना आधीच सांगून ठेवलं होतं. खांदा बरा होईपर्यंत आरामच करेन अन्यथा हे दुखणं असंच वाढत जाणार” असं गौरव मोरेने सांगितलं. त्यामुळे गौरवला हास्यजत्रेत पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व