Nagpur Accident News : लग्न आटोपून येत असलेल्या वर्‍हाडी मंडळींवर काळाचा घाला

  101

अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी


नागपूर : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) काटोलमध्ये (Katol) लग्न आटोपून परतत असलेल्या वर्‍हाडी मंडळींवर काळाने घाला घातला आहे. वर्‍हाडींची क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान घडली.


काल मध्यरात्रीच्या सुमारास एका क्वॉलीस कारमधून सात जण लग्न समारंभ आटोपून नागपूरहून काटोलच्या दिशेने आपल्या घरी परतत होते. पण रस्त्यातच समोरून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात क्वॉलीस गाडीचा चक्काचूर झाला. अपघातात क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत.


अपघातातील मृतांची नावे :
अजय दशरथ चिखले (वय ४५)
विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५)
सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२)
रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८)
मयूर मोरेश्वर इंगळे (वय २६)
वैभव साहेबराव चिखले (वय ३२)


अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. काही स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Comments
Add Comment

Pune Metro: गणेश भक्तांसाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

पुणे: गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना

"हिंदूंच्या सणाला विघ्न नको", नवनीत राणांचा जरांगे पाटलांना सल्ला

अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया

मनोज जरांगे विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी युट्यूबरला काळं फासलं, कपडे फाडले

छत्रपती संभाजी नगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी एका

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात