Nagpur Accident News : लग्न आटोपून येत असलेल्या वर्‍हाडी मंडळींवर काळाचा घाला

अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी


नागपूर : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) काटोलमध्ये (Katol) लग्न आटोपून परतत असलेल्या वर्‍हाडी मंडळींवर काळाने घाला घातला आहे. वर्‍हाडींची क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान घडली.


काल मध्यरात्रीच्या सुमारास एका क्वॉलीस कारमधून सात जण लग्न समारंभ आटोपून नागपूरहून काटोलच्या दिशेने आपल्या घरी परतत होते. पण रस्त्यातच समोरून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात क्वॉलीस गाडीचा चक्काचूर झाला. अपघातात क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत.


अपघातातील मृतांची नावे :
अजय दशरथ चिखले (वय ४५)
विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५)
सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२)
रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८)
मयूर मोरेश्वर इंगळे (वय २६)
वैभव साहेबराव चिखले (वय ३२)


अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. काही स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू