Nagpur Accident News : लग्न आटोपून येत असलेल्या वर्‍हाडी मंडळींवर काळाचा घाला

अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी


नागपूर : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) काटोलमध्ये (Katol) लग्न आटोपून परतत असलेल्या वर्‍हाडी मंडळींवर काळाने घाला घातला आहे. वर्‍हाडींची क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान घडली.


काल मध्यरात्रीच्या सुमारास एका क्वॉलीस कारमधून सात जण लग्न समारंभ आटोपून नागपूरहून काटोलच्या दिशेने आपल्या घरी परतत होते. पण रस्त्यातच समोरून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात क्वॉलीस गाडीचा चक्काचूर झाला. अपघातात क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत.


अपघातातील मृतांची नावे :
अजय दशरथ चिखले (वय ४५)
विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५)
सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२)
रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८)
मयूर मोरेश्वर इंगळे (वय २६)
वैभव साहेबराव चिखले (वय ३२)


अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. काही स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास