नागपूर : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) काटोलमध्ये (Katol) लग्न आटोपून परतत असलेल्या वर्हाडी मंडळींवर काळाने घाला घातला आहे. वर्हाडींची क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान घडली.
काल मध्यरात्रीच्या सुमारास एका क्वॉलीस कारमधून सात जण लग्न समारंभ आटोपून नागपूरहून काटोलच्या दिशेने आपल्या घरी परतत होते. पण रस्त्यातच समोरून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात क्वॉलीस गाडीचा चक्काचूर झाला. अपघातात क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत.
अपघातातील मृतांची नावे :
अजय दशरथ चिखले (वय ४५)
विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५)
सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२)
रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८)
मयूर मोरेश्वर इंगळे (वय २६)
वैभव साहेबराव चिखले (वय ३२)
अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. काही स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…