Love Jihad law : 'महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणणार' मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

आज पार पडली हिंदुत्ववादी संघटनांची बैठक


नागपूर : महाराष्ट्रात लव्ह जिहाद (Love jihad) हा गंभीर मुद्दा बनत चालला आहे. याविरोधात कायदा व्हावा यासाठी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) सातत्याने मागणी करत असतात. तसेच लवकरच महाराष्ट्रात हा कायदा आणला जाईल, असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांनीही (Hindutva organisations) लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी केल्यामुळे लवकरच हा कायदा महाराष्ट्रात आणला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पार पडलेल्या बैठकीत दिलं.


आज पार पडलेल्या बैठकीत हिंदू जनजागृती समिती, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू विधिज्ञ परिषद, सनातन संस्था, संकल्प हिंदू राष्ट्र अभियान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, राष्ट्रीय युवा गठबंधन, सर्वभाषिक बाह्मण महासंघ, चित्पावन ब्राह्मण महासंघ आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी बैठकीला ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते.


हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले, महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या विरोधात पन्नासहून अधिक मोर्चे काढण्यात आले. परंतु आश्वासन दिल्यानंतरही त्यासाठी कायदा मात्र झालेला नाही. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदा केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्रामुख्याने या बैठकीमध्ये लव्ह जिहाद तसेच मंदिरांना मदतीच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यात आले.


यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,‘लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. कायद्यासंदर्भात राज्य सरकारने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल.’ त्यामुळे महाराष्ट्रातही लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा येणार आहे.


Comments
Add Comment

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे