Health: हे वाचल्यावर तुम्ही दररोज नारळपाणी पिण्यास कराल सुरूवात

मुंबई: नारळाचे पाणी(coconut water) हे पोषणतत्वांनी भरलेले असते जे आपल्या आरोग्यासाठी(health) अतिशय फायदेशीर आहे. हे एक चांगले पेय आहे जे लोक उन्हाळ्याच्या दिवसांत पितात मात्र नारळपाणी केवळ गरमीच्याच दिवसांत पिऊ नये तर प्रत्येक मोसमात प्यायले पाहिजे. कारण नारळपाणी केवळ तहानच भागवत नाही तर अनेकदृष्ट्या हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे.


जर तुम्हाला हेल्दी आणि फ्रेश ड्रिंक प्यायचे असेल तर नारळपाणी हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या नारळपाणी पिण्याचे ५ फायदे



त्वचेचे आरोग्य


नारळपाणी तरल पदार्थांचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यातील अँटीऑक्सिडंटमुळे तुमच्या फाईन लाईन्स तसेच सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचते. यातील व्हिटामिन सी आणि ई असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी गरजेचे असतात.



किडनी स्टोनपासून बचाव


किडनी स्टोनपासून बचावासाठी डॉक्टर तुम्हाला खूप पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला थोडे नारळपाणीही प्यायला हवे. यामुळे युरिनची फ्रिक्वेन्सी वाढते आणि स्टोन बनवणारे खनिजे कमी होतात.



पाचनक्रिया सुधारते


नारळपाण्यामध्ये फायबर असते जे पाचन सुधारण्यासाठी मदत करतात. यात एन्झाईम असतात जे जेवण पचवण्यास मदत करतात. यामुळे पोटाचे आजार दूर होतात.



इलेक्ट्रोलाईट संतुलन


नारळपाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम असते हे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाईट आहेत जे शरीरात द्रव संतुलन नियमित करण्यास मदत करतात. ज्यांना खूप घाम येतो त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.



ब्लडप्रेशर नियंत्रित


नारळ पाणी ब्लडप्रेशर कमी कऱण्यासही मदत करते. खासकरून ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे चांगले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या