केएल राहुलपेक्षा १०० पटीने जास्त त्रास मला होतो, सुनील शेट्टीने व्यक्त केल्या भावना

मुंबई: भारतीय संघातील स्टार क्रिकेटर केएल राहुलवर अनेकदा क्रिकेट चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. मात्र नेहमीच तो यावर शांत राहिला आहे.


राहुलने विश्वचषक २०२३मध्ये जबरदस्त कामगिरी करत सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली. मात्र या टीकेवर आता त्याचे सासरे सुनील शेट्टीने मौन सोडले आहे. बॉलिवूड दिग्गज सुनील शेट्टीने न्यूज एजन्सी एनआयला सांगितले की, राहुलपेक्षा १०० पटींने मला जास्त त्रास होतो. दरम्यान, राहुल मला सांगेल की यावर तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका. माझे बॅटच टीकाकारांना उत्तर देईल.


सुनील पुढे म्हणाला, लोकांना, सिलेक्टर्स आणि कॅप्टनला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. जर राहुल आणि अथियाला कोणी दु:ख देत असेल त्याने मला १०० पट जास्त वाईट वाटते.जेव्हा भारतीय संघ खेळतो तेव्हा तो थोडा अंधविश्वासू होते. त्याने संपूर्ण विश्वचषक आणि सामने आपली पत्नी माना शेट्टीसोबत रुममध्ये जमिनीवर बसून पाहिले.


सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलला बराच काळ डेट केल्यानंतर जानेवारी २०२३मध्ये लग्न केले होते. यंदाच्या विश्वचषकात केएल राहुलने ११ सामन्यातील १० डावांमध्ये ४५२ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी ७५.३३ इतकी होती. राहुलने १ शतक आणि २ अर्धशतके ठोकली होती.

Comments
Add Comment

Tejasavee Ghosalkar : दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा 'महाविजय'! उबठाच्या धनश्री कोलगेंचा दारुण पराभव; मुंबईत भाजपची मुसंडी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दहिसरच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला आहे. प्रभाग

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या