केएल राहुलपेक्षा १०० पटीने जास्त त्रास मला होतो, सुनील शेट्टीने व्यक्त केल्या भावना

  265

मुंबई: भारतीय संघातील स्टार क्रिकेटर केएल राहुलवर अनेकदा क्रिकेट चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. मात्र नेहमीच तो यावर शांत राहिला आहे.


राहुलने विश्वचषक २०२३मध्ये जबरदस्त कामगिरी करत सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली. मात्र या टीकेवर आता त्याचे सासरे सुनील शेट्टीने मौन सोडले आहे. बॉलिवूड दिग्गज सुनील शेट्टीने न्यूज एजन्सी एनआयला सांगितले की, राहुलपेक्षा १०० पटींने मला जास्त त्रास होतो. दरम्यान, राहुल मला सांगेल की यावर तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका. माझे बॅटच टीकाकारांना उत्तर देईल.


सुनील पुढे म्हणाला, लोकांना, सिलेक्टर्स आणि कॅप्टनला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. जर राहुल आणि अथियाला कोणी दु:ख देत असेल त्याने मला १०० पट जास्त वाईट वाटते.जेव्हा भारतीय संघ खेळतो तेव्हा तो थोडा अंधविश्वासू होते. त्याने संपूर्ण विश्वचषक आणि सामने आपली पत्नी माना शेट्टीसोबत रुममध्ये जमिनीवर बसून पाहिले.


सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलला बराच काळ डेट केल्यानंतर जानेवारी २०२३मध्ये लग्न केले होते. यंदाच्या विश्वचषकात केएल राहुलने ११ सामन्यातील १० डावांमध्ये ४५२ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी ७५.३३ इतकी होती. राहुलने १ शतक आणि २ अर्धशतके ठोकली होती.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.