केएल राहुलपेक्षा १०० पटीने जास्त त्रास मला होतो, सुनील शेट्टीने व्यक्त केल्या भावना

मुंबई: भारतीय संघातील स्टार क्रिकेटर केएल राहुलवर अनेकदा क्रिकेट चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. मात्र नेहमीच तो यावर शांत राहिला आहे.


राहुलने विश्वचषक २०२३मध्ये जबरदस्त कामगिरी करत सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली. मात्र या टीकेवर आता त्याचे सासरे सुनील शेट्टीने मौन सोडले आहे. बॉलिवूड दिग्गज सुनील शेट्टीने न्यूज एजन्सी एनआयला सांगितले की, राहुलपेक्षा १०० पटींने मला जास्त त्रास होतो. दरम्यान, राहुल मला सांगेल की यावर तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका. माझे बॅटच टीकाकारांना उत्तर देईल.


सुनील पुढे म्हणाला, लोकांना, सिलेक्टर्स आणि कॅप्टनला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. जर राहुल आणि अथियाला कोणी दु:ख देत असेल त्याने मला १०० पट जास्त वाईट वाटते.जेव्हा भारतीय संघ खेळतो तेव्हा तो थोडा अंधविश्वासू होते. त्याने संपूर्ण विश्वचषक आणि सामने आपली पत्नी माना शेट्टीसोबत रुममध्ये जमिनीवर बसून पाहिले.


सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलला बराच काळ डेट केल्यानंतर जानेवारी २०२३मध्ये लग्न केले होते. यंदाच्या विश्वचषकात केएल राहुलने ११ सामन्यातील १० डावांमध्ये ४५२ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी ७५.३३ इतकी होती. राहुलने १ शतक आणि २ अर्धशतके ठोकली होती.

Comments
Add Comment

वेध निवडणुकीचे : धारावीमध्ये फुलणार भाजपचे कमळ

मुंबई(सचिन धानजी) : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही नगरसेवक निवडून

'अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्‍या बांधकामामुळे बाधित होणा-या पात्र रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा'

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे प्रत्‍यक्ष पाहणी दौ-यादरम्‍यान निर्देश मुंबई (खास

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील जैव खाणकामासाठी नवयुग इंजिनिअरींगची निवड

बायोमायनिंग प्रकल्पासाठी तब्बल ३०३५ कोटी रुपये होणार खर्च मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने देवनार

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या