Article 370: जम्मू-काश्मीरला पुन्हा मिळणार विशेष दर्जा? Article 370वर आज सुनावणी

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱे कलम ३७० केंद्र सरकारने रद्द केले. केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्दबातलकरण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी देणार आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे संविधान पीठ याबाबतचा निर्णय देणार आहे.


या पिठाचे इथर सदस्य न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १६ दिवसांच्या सुनावणीनंतर पाच सप्टेंबरला या प्रकरणातील आपला निर्णय राखून ठेवला होता.


सर्वोच्च न्यायलयाने सुनावणीदरम्यान कलम ३७० रद्द करण्याचा बचाव करणारे आणि केंद्राकडून सादर अटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे, राकेश द्विवेदी, व्ही गिरी आणि इतरांचे म्हणणे ऐकून घेतले होते.


याचिकांकर्त्यांकडून कपिल सिब्बल, गोपाळ सुब्रमण्यम, राजीव धवन, जफर शाह, दुष्यंत दवे आणि इतर वरिष्ठ अधिवक्त्यांचा वादही ऐकला होता.


केंद्र सरकारडून जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देमाणे संविधानातील कलम ३७० हे ५ ऑगस्ट २०१९मध्ये रद्दबातल ठरवले होते. त्यांतर राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विभाजित करण्यात आले होते.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च