कसारा-इगतपुरी दरम्यान मालगाडीचे डबे घसरले, नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत

नाशिक: कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरले आहेत. मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईन वरील म्हणजेच नाशिक दिशेने जाणारी वाहतूक रखडली आहे. मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही. लोकल वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला नाही.


कसारा स्थानकातून इगतपुरी च्या दिशेने जात असताना ५०० मीटर अंतरावर मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.


कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरल्याची घटना आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. TGR 3 जवळ मुख्य मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईनवरील म्हणजेच नाशिक दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे रखडली आहे. रेल्वे रुळावरुन मालगाडीचे डब्बे बाजूला करण्याचे काम सुरु आहे. पण यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.


मालगाडीचे डबे रुळावरुन बाजूला काढून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्याojcस खूप वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कल्याण येथून एक्सीडेंट रिलीफ ट्रेन पाठवण्यात आली आहे. तोपर्यंत मुंबईवरून नाशिक दिशेने भारतात विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्या थांबवल्या आहेत किंवा दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.सी एस एम टी हावडा आणि सी एस एम टी आदिलाबाद, नंदीग्राम एक्सप्रेस या अपघातामुळे रखडल्या आहेत. मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही, लोकल वाहतुकीवर देखील याचा कोणताही परिणाम नाही.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद