कसारा-इगतपुरी दरम्यान मालगाडीचे डबे घसरले, नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत

नाशिक: कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरले आहेत. मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईन वरील म्हणजेच नाशिक दिशेने जाणारी वाहतूक रखडली आहे. मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही. लोकल वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला नाही.


कसारा स्थानकातून इगतपुरी च्या दिशेने जात असताना ५०० मीटर अंतरावर मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.


कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरल्याची घटना आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. TGR 3 जवळ मुख्य मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईनवरील म्हणजेच नाशिक दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे रखडली आहे. रेल्वे रुळावरुन मालगाडीचे डब्बे बाजूला करण्याचे काम सुरु आहे. पण यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.


मालगाडीचे डबे रुळावरुन बाजूला काढून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्याojcस खूप वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कल्याण येथून एक्सीडेंट रिलीफ ट्रेन पाठवण्यात आली आहे. तोपर्यंत मुंबईवरून नाशिक दिशेने भारतात विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्या थांबवल्या आहेत किंवा दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.सी एस एम टी हावडा आणि सी एस एम टी आदिलाबाद, नंदीग्राम एक्सप्रेस या अपघातामुळे रखडल्या आहेत. मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही, लोकल वाहतुकीवर देखील याचा कोणताही परिणाम नाही.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे