कसारा-इगतपुरी दरम्यान मालगाडीचे डबे घसरले, नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत

नाशिक: कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरले आहेत. मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईन वरील म्हणजेच नाशिक दिशेने जाणारी वाहतूक रखडली आहे. मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही. लोकल वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला नाही.


कसारा स्थानकातून इगतपुरी च्या दिशेने जात असताना ५०० मीटर अंतरावर मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.


कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरल्याची घटना आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. TGR 3 जवळ मुख्य मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईनवरील म्हणजेच नाशिक दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे रखडली आहे. रेल्वे रुळावरुन मालगाडीचे डब्बे बाजूला करण्याचे काम सुरु आहे. पण यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.


मालगाडीचे डबे रुळावरुन बाजूला काढून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्याojcस खूप वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कल्याण येथून एक्सीडेंट रिलीफ ट्रेन पाठवण्यात आली आहे. तोपर्यंत मुंबईवरून नाशिक दिशेने भारतात विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्या थांबवल्या आहेत किंवा दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.सी एस एम टी हावडा आणि सी एस एम टी आदिलाबाद, नंदीग्राम एक्सप्रेस या अपघातामुळे रखडल्या आहेत. मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही, लोकल वाहतुकीवर देखील याचा कोणताही परिणाम नाही.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात